AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पादचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्यास ड्रायव्हर दोषी नाही; कोर्टाचा निर्णय

रस्ते अपघातप्रकरणी दादरच्या मॅजिस्ट्रेट कोर्टाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. (Driver can't be held liable for pedestrian's negligence, says dadar court)

पादचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्यास ड्रायव्हर दोषी नाही; कोर्टाचा निर्णय
2013 मधील हत्या प्रकरणी औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
| Updated on: May 22, 2021 | 3:22 PM
Share

मुंबई: रस्ते अपघातप्रकरणी दादरच्या मॅजिस्ट्रेट कोर्टाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. पादचाऱ्याच्या चुकीमुळे जर अपघात झाला. तर वाहनचालकाला दोषी धरता येणार नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे. (Driver can’t be held liable for pedestrian’s negligence, says dadar court)

मॅजिस्ट्रेट कोर्टाचे न्यायाधीश पी. देशमाने यांनी हा निर्णय दिला आहे. रस्त्यावरून चालताना किंवा रस्ता ओलांडताना सावध राहणं हे पादचाऱ्याचं कर्तव्य आहे. पादचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे जर अपघात होत असेल तर ड्रायव्हरला दोषी धरता येणार नाही, असं देशमाने यांनी स्पष्ट केलं. तसेच 5 वर्षापूर्वी झालेल्या अपघात प्रकरणातून एका 65 वर्षी महिलेला कोर्टाने निर्दोष मुक्त केलं आहे.

सहा वर्षापूर्वी अपघात

20 ऑक्टोबर 2015 रोजीचं हे प्रकरण आहे. 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता एक महिला पायी ऑफिसला जात होती. दादरच्या पारसी अग्यारी पर्यंत ही महिला आली असेल तेव्हा एका कारने तिला धडक दिली. त्यामुळे ही महिला जमिनीवर कोसळली असता तिच्या पायाच्या अंगठ्यावरून कारचं चाक गेलं. एक उद्योजिका ही कार चालवत होती. दुर्घटना झाल्यानंतर या महिलेने कार थांबवलीही होती.

भोईवाडा कोर्टात प्रकरण

दुसऱ्या दिवशी जखमी महिलेच्या पतीने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर काही आठवड्यानंतर या महिलेचा जबाब नोंदवण्यात आला आणि खटला दाखल करण्यात आला. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी आरोपपत्रं दाखल केलं होतं. या प्रकरणी कोर्टाने दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर आज हा महत्त्वाचा निर्णय दिला.

पायी चालणाऱ्यांसाठी रस्ते, तर…

पायी चालणाऱ्यांसाठी फुटपाथ बनविण्यात आले आहेत. तसेच वाहनांसाठी रस्ते बनविण्यात आला आहेत. परंतु, जखमी महिला रस्त्यावरून जात होती. त्यामुळे गाडी चालवणाऱ्या महिलेला दोषी धरता येणार नाही, असं कोर्टाने निकालात म्हटलं आहे. (Driver can’t be held liable for pedestrian’s negligence, says dadar court)

संबंधित बातम्या:

वर्षभरापूर्वी पतीचं निधन, आता दिराने वहिनीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन संपवलं!

पंधरा दिवसांपूर्वी जामिनावर सुटका, सराईत गुन्हेगाराची दगडाने ठेचून हत्या

बहिणीसोबत भांडताना ओरडल्याचा राग, पुण्यात 13 वर्षांच्या मुलाने कांदा चिरताना वडिलांना भोसकलं

(Driver can’t be held liable for pedestrian’s negligence, says dadar court)

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.