AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक, वीज बिल जास्त येतं म्हणून बटण बंद केलं, तेव्हा समजलं घरात सहा महिन्यापासून आहे मृतदेह

एका धक्कादायक हत्या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. सहा महिन्यापासून एक कुटुंब ज्या घरात राहत होतं, त्या घरात एक मृतदेह आहे, हे त्यांना माहितच नव्हतं. अखेर वीज बिल जास्त येतं म्हणून त्यांनी एक बटण बंद केलं, तेव्हा या हत्येचा खुलासा झाला.

धक्कादायक, वीज बिल जास्त येतं म्हणून बटण बंद केलं, तेव्हा समजलं घरात सहा महिन्यापासून आहे मृतदेह
Room Image Credit source: AI Genreated Image
| Updated on: Jan 11, 2025 | 2:06 PM
Share

मध्य प्रदेश देवासमध्ये एका धक्कादायक हत्या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. एका कुटुंबाला त्यांच्या घरात सहा महिन्यापासून मृतदेह आहे हे माहितच नव्हतं. लिव इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेची तिच्या जोडीदारानेच निर्घृण हत्या केली होती. मित्राच्या मदतीने मिळून त्याने ही हत्या केली होती. त्याचा साथीदार राजस्थानच्या तुरुंगात बंद आहे. पोलीस त्याचा रिमांड मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. देवासमध्ये बायपास रोडवर वृंदावन धाम कॉलनी येथे हे घर आहे. या घराचे मालक धीरेंद्र श्रीवास्तव मागच्या सहा महिन्यांपासून दुबईत आहेत. या घराच्या उजव्या बाजूला एक रुम, किचन आणि टॉयलेट आहे. डाव्याबाजूला दोन बेडरुम आणि हॉल आहे. दोन्ही बाजू वरच्या मजल्यावर जाणाऱ्या शिड्यांनी जोडलेल्या आहेत. वरचा मजला हा श्रीवास्तव यांच्या ताब्यात आहे.

बलवीर राजपूत यांनी जुलै 2024 पासून तळमजला भाड्यावर घेतला होता. बलबीर हे दुबईत राहणारे घराचे मालक धीरेंद्र श्रीवास्तव यांना घराच्या दुसऱ्या दोन रुम वापरण्यास परवानगी द्यावी म्हणून सतत विनंती करत होते. पत्नी आणि दोन मुलांसह ते येथे राहतात. बलवीर राजपूत यांच्याआधी धीरेंद्र श्रीवास्तव यांनी संजय पाटीदार यांना हे घर भाड्यावर दिलं होतं. संजय यांनी जून 2024 मध्ये घर खाली केलं. पण दोन खोल्यांमध्ये काही सामान सोडलं होतं. या दरम्यान संजय इथे येऊन-जाऊन असायचा. पण तो सामान असलेल्या दोन रुम्स रिकामी करत नव्हता व भाडं सुद्धा देत नव्हता.

सकाळी सामान आपण बाहेर काढू असं त्यांनी ठरवलं

घरमालकाने बलवीर राजपूत यांना बंद असलेले ते दोन रुम उघडण्याची परवानगी दिली. गुरुवारी बलबीर यांनी टाळं तोडून त्या रुममध्ये प्रवेश केला. साफसफाई करताना फ्रीज चालू असल्याच त्यांना दिसलं. आधीचा भाडेकरु संजय पाटीदारच्या बेजबाबदारपणावर ते वैतागले. यामुळे आपल्याला जास्त लाईट बील येतं असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी फ्रीज बंद केला. सकाळी सामान आपण बाहेर काढू असं त्यांनी ठरवलं. शुक्रवारी सकाळी मात्र बंद खोलीतून अत्यंत घाण वास येऊ लागला. शेजाऱ्यांनी या बद्दल पोलिसांना कळवलं. पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला. फ्रीज उघडल्यानंतर त्यात कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला.

हत्या का केली?

मृत महिलेच नाव पिंकी ऊर्फ प्रतिभा प्रजापती होतं. संजय पाटीदारची ती लिव्ह इन पार्टनर होती. बेडशीट गुंडाळलेल्या अवस्थेत हा मृतदेह होता. संजयने चौकशीत पोलिसांना सांगितलं की, पिंकी त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. म्हणून त्याने मित्राच्या मदतीने गळा आवळून तिची हत्या केली व फ्रीजमध्ये मृतदेह ठेवला. त्याने फ्रीज सुरुच ठेवल्यामुळे या हत्येचा इतके महिने उलगडा होऊ शकला नाही.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.