AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crime News : तलावात बुडून 18 तास उलटले, आता प्रशासन म्हणते…

Crime News : जळगावातील वसंतवाडी येथे तलावात पोहण्यासाठी गेलेल्या प्रौढ तलावात बुडून बेपत्ता झाले आहेत. त्यांना तलावात बुडून 18 तास उलटले तरी त्यांचा शोध लागेला.

Crime News : तलावात बुडून 18 तास उलटले, आता प्रशासन म्हणते...
jalgaon vasantwadiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 10, 2023 | 7:48 PM
Share

जळगाव : तालुक्यातील वसंतवाडी (vasantwadi) येथे तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा तलावाच्या (lake) पाण्यात बुडाली आहे. त्या व्यक्तीचं नाव रमेश भिका चव्हाण वय (४२) असे आहे. ती व्यक्ती तिथं बुडाल्यापासून पोलिस प्रशासन आणि इतर पथक त्यांचा शोध घेत आहे. परंतु त्यांचा अद्याप कसल्याची प्रकारचा शोध लागलेला नाही अशी माहिती पोलिसांनी (police) दिली आहे. त्या परिसरातील आणि गावकऱ्यांना सुध्दा या प्रकरणामुळे धक्का बसला आहे. तलावात मगरी असल्याचा अनेकांनी संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या पद्धतीने शोध सुरु केला आहे.

तलावाच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाले

वसंतवाडी येथील तलावात भुलाबाई विसर्जनासाठी काही मुली सोमवारी सायंकाळी 5 वाजता गेलेल्या होत्या. त्यावेळी ठिकाणी रमेश चव्हाण हे तलावामध्ये पोहत होते. अचानक ते तलावाच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाले. विसर्जनासाठी आलेल्या मुलींनी हा प्रकार पाहिला त्यामुळे घटना उघडकीस आली. त्या मुलींनी हा प्रकार गावातील लोकांच्या कानावर घातला. गावकऱ्यांनी पोलिस प्रशासन आणि अग्निशमक दलाला ही माहिती दिली.

तलावात बुडून 18 तास उलटले

सध्या घटनास्थळी महसूल व पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पथक मृतदेह शोधत असल्याचे पाहायला मिळाले आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून त्यांनी शोध मोहीम सुरू केली आहे. 18 तासांच्या वर कालावधी होऊनही त्या व्यक्तीचा शोध अद्याप लागलेला नाही.

एखादी व्यक्ती पाण्यात बुडाल्यानंतर १२ तासाने बुडत्या व्यक्तीचा मृतदेह पाण्यावरती तरंगू लागतो. परंतु पाण्यात बुडालेल्या व्यक्तीचा शोध न लागल्यामुळे संपूर्ण गावकरी टेन्शनमध्ये आहेत. अनेकांनी तलावात मगर असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.