AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चप्पलचा पट्टा तुटण्याची छोटीशी गोष्ट, आधी बकार मागितला मग दोघांची मुंडकी कुऱ्हाडीने उडवली, कुठे घडली ही धक्कादायक घटना?

घराच्या दरवाजात असलेल्या चप्पलेचा पट्टा तुटला. त्यावरुन वाद इतका वाढला की, दोघांना आपले प्राण गमवावे लागले. सध्या माणसांच्या संयमाला झालय काय? असा प्रश्न या घटनेमुळे निर्माण होतो.

चप्पलचा पट्टा तुटण्याची छोटीशी गोष्ट, आधी बकार मागितला मग दोघांची मुंडकी कुऱ्हाडीने उडवली, कुठे घडली ही धक्कादायक घटना?
Crime News
| Updated on: Nov 29, 2025 | 3:23 PM
Share

एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. चप्पलच्या पट्ट्यावरुन सुरु झालेला छोटासा वाद इतका वाढला की, दोघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. इतक्या छोट्याशा कारणावरुन झालेल्या दोन हत्यांमुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. आरोपीला अटक करुन त्याची चौकशी सुरु आहे. 72 वर्षीय सरगिया बालमुचू आणि त्यांची 65 वर्षीय पत्नी मुक्ता बालमुचू या दोघांचा मृत्यू झाला. या जोडप्याचा 31 वर्षीय मुलगा चरण बालमुचूने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर तपासासाठी पोलिसांची विशेष टीम बनवण्यात आली. झारखंडच्या पश्चिमी सिंहभूम येथील गुआगु गावात ही धक्कादायक घटना घडली.

पोलिसांनी सांगितलं की, सरगिया बालमुचू आणि त्यांची पत्नी मुक्ता बालमुचू यांची हत्या शेजारी राहणाऱ्या जंगम बालमुचूने केली. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. जंगमला त्याच्या चप्पलचा पट्टा तुटलेला दिसला. त्यावरुन तो संतापला. यासाठी त्याने बालमुचू जोडप्याच्या मुलींना जबाबदार धरलं. त्यावरुन दोन्ही कुटुंबांमध्ये वाद सुरु झाला. हळूहळू हा वाद तीव्र होत गेला. पोलिसांनी ही माहिती दिली.

बैठकीत वाद का वाढला?

वाद सोडवण्यासाठी मागच्या रविवारी पंचायतीची बैठक बोलवण्यात आली. पण वादावर तोडगा निघण्याऐवजी अजून वाढला. बैठकी दरम्यान जंगमने पंचायतीसमोर एक बकरा आणि दारुची मागणी केली. जोडप्याने आपल्या आर्थिक परिस्थितीचा हवाला देत मागणी पूर्ण करण्यात असमर्थता दाखवली. त्यानंतर आरोपी नाराज होऊन बैठकीतून निघून गेला.

रात्री काय घडलं ते समजलं नाही

पोलिसांनुसार, आरोपीने याच रागातून रविवारी रात्री जोडप्याच्या घरी जाऊन हे हत्याकांड केलं. आरोपीने कुऱ्हाडीने दोघांचं मुंडकं उडवल्याचा प्राथमिक तपासातून समोर आलय. आसपासच्या लोकांना रात्री काय घडलं ते समजलं नाही.

ग्रामस्थ ते दृश्य पाहून हादरले

मंगळवारी सकाळी गावात मृतदेहाची दुर्गंधी पसरल्यानंतर या घटनेचा खुलासा झाला. गावकरी घरात गेले, तेव्हा दोघे पती-पत्नी रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेले होते. ग्रामस्थ ते दृश्य पाहून हादरले. त्यांनी पोलिसांना सूचना दिली. पोलीस सध्या आरोपीची चौकशी करत आहेत. या घटनेनंतर गावात भय आणि तणावाचं वातावरण आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.