AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चप्पलचा पट्टा तुटण्याची छोटीशी गोष्ट, आधी बकार मागितला मग दोघांची मुंडकी कुऱ्हाडीने उडवली, कुठे घडली ही धक्कादायक घटना?

घराच्या दरवाजात असलेल्या चप्पलेचा पट्टा तुटला. त्यावरुन वाद इतका वाढला की, दोघांना आपले प्राण गमवावे लागले. सध्या माणसांच्या संयमाला झालय काय? असा प्रश्न या घटनेमुळे निर्माण होतो.

चप्पलचा पट्टा तुटण्याची छोटीशी गोष्ट, आधी बकार मागितला मग दोघांची मुंडकी कुऱ्हाडीने उडवली, कुठे घडली ही धक्कादायक घटना?
Crime News
| Updated on: Nov 29, 2025 | 3:23 PM
Share

एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. चप्पलच्या पट्ट्यावरुन सुरु झालेला छोटासा वाद इतका वाढला की, दोघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. इतक्या छोट्याशा कारणावरुन झालेल्या दोन हत्यांमुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. आरोपीला अटक करुन त्याची चौकशी सुरु आहे. 72 वर्षीय सरगिया बालमुचू आणि त्यांची 65 वर्षीय पत्नी मुक्ता बालमुचू या दोघांचा मृत्यू झाला. या जोडप्याचा 31 वर्षीय मुलगा चरण बालमुचूने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर तपासासाठी पोलिसांची विशेष टीम बनवण्यात आली. झारखंडच्या पश्चिमी सिंहभूम येथील गुआगु गावात ही धक्कादायक घटना घडली.

पोलिसांनी सांगितलं की, सरगिया बालमुचू आणि त्यांची पत्नी मुक्ता बालमुचू यांची हत्या शेजारी राहणाऱ्या जंगम बालमुचूने केली. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. जंगमला त्याच्या चप्पलचा पट्टा तुटलेला दिसला. त्यावरुन तो संतापला. यासाठी त्याने बालमुचू जोडप्याच्या मुलींना जबाबदार धरलं. त्यावरुन दोन्ही कुटुंबांमध्ये वाद सुरु झाला. हळूहळू हा वाद तीव्र होत गेला. पोलिसांनी ही माहिती दिली.

बैठकीत वाद का वाढला?

वाद सोडवण्यासाठी मागच्या रविवारी पंचायतीची बैठक बोलवण्यात आली. पण वादावर तोडगा निघण्याऐवजी अजून वाढला. बैठकी दरम्यान जंगमने पंचायतीसमोर एक बकरा आणि दारुची मागणी केली. जोडप्याने आपल्या आर्थिक परिस्थितीचा हवाला देत मागणी पूर्ण करण्यात असमर्थता दाखवली. त्यानंतर आरोपी नाराज होऊन बैठकीतून निघून गेला.

रात्री काय घडलं ते समजलं नाही

पोलिसांनुसार, आरोपीने याच रागातून रविवारी रात्री जोडप्याच्या घरी जाऊन हे हत्याकांड केलं. आरोपीने कुऱ्हाडीने दोघांचं मुंडकं उडवल्याचा प्राथमिक तपासातून समोर आलय. आसपासच्या लोकांना रात्री काय घडलं ते समजलं नाही.

ग्रामस्थ ते दृश्य पाहून हादरले

मंगळवारी सकाळी गावात मृतदेहाची दुर्गंधी पसरल्यानंतर या घटनेचा खुलासा झाला. गावकरी घरात गेले, तेव्हा दोघे पती-पत्नी रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेले होते. ग्रामस्थ ते दृश्य पाहून हादरले. त्यांनी पोलिसांना सूचना दिली. पोलीस सध्या आरोपीची चौकशी करत आहेत. या घटनेनंतर गावात भय आणि तणावाचं वातावरण आहे.

Follow Us
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.