AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जबाबदारी घेतली, पण सांभाळायचा कंटाळा आला, 4 वर्षाच्या चिमुरडीसोबत जे घडलं ते ऐकून तुमच्याही डोळ्यात येतील अश्रू !

कल्याणमधील ४ वर्षीय मुलीच्या अपहरण आणि हत्येच्या प्रकरणात तिच्या मावशी आणि पतीला अटक करण्यात आली आहे. मुलीचे वडील तुरुंगात असताना आईने दुसरा विवाह केला. मावशीने मुलीची जबाबदारी घेतली परंतु तिच्या वागण्याबद्दल तिला मारहाण केली आणि ती मारली गेली. त्यांनी मृतदेह जंगलात फेकला होता. आठ महिन्यांनंतर पोलिसांनी आरोपींना रायगडहून अटक केली.

जबाबदारी घेतली, पण सांभाळायचा कंटाळा आला, 4 वर्षाच्या चिमुरडीसोबत जे घडलं ते ऐकून तुमच्याही डोळ्यात येतील अश्रू !
क्राईम न्यूजImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Aug 13, 2025 | 9:37 AM
Share

आजकाल मोबाईल, आणि सोशल मीडियामुळे आपलं जग तर विस्तारत चाललं आहे, गऱबसल्या आपण आपल्या देशासह परदेशातील, दूरच्या ठिकाणच्या घडामोडी पाहू शकतो, लांब राहणाऱ्या नातेवाईकांशी, कुटुंबियांशी सहज बोलू शकतो, जग एकाप्रकारे जवळच येत चाललं आहे. मात्र याच जगात माणूसकी नावाचा प्राकर हरवत चालला आहे की काय असा प्रश्न पडावा अशा घटना सध्या घडत आहेत. माणूसकीला काळिमा फासणारी अशीच एक घटना कल्याण शहरात घडलू असून त्यामुळे कल्याणकर अक्षरश: हादरले आहेत.

तिथे अवघ्या 4 वर्षांच्या निरागस मुलीचे अपहरण आणि हत्या झाल्याने सर्वांनाच धक्का बसला होता, मात्र त्याच प्रकरणी अतिशय भयानक आणि हादरवणारा प्रकार उघड झाला आहे. त्या मुलीच्या मावशीने आणि तिच्या पतीनचे मुलीची हत्या करून गादीत गुंडाळून तिचा मृतदेह जंगलात फेकून दिला. त्यांच्या या भयानक कृत्यामागचं कारण ऐकून तर तुम्ही अवाक् व्हाल.. त्या मुलीची जबाबदारी त्यांनी घेतली पण सांभाळायला कंटाळा आला म्हणून त्यांनी तिचा थेट जीवच घेतला. अपहरण आणि हत्येचा गुन्हा कल्याण कोळेसवाडी पोलिसांनी आठ महिन्यांनंतर उघडकीस आणला आहे. आरोपी मावशी आणि तिच्या पतीला पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील चिंचवली गावातून अटक केली.

सांभाळायचा कंटाळा आला म्हणून मृत्यूच्या दारी ढकललं

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे वडील हे चोरीच्या गुन्ह्यात तुरुंगात असताना, तिची आई दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमविवाह करून त्या मुलीला तशीच सोडून गेली होती. त्यानंतर नातेवाईक असलेली चुलत मावशी अपर्णा कांबरी आणि तिचा पती प्रथमेश कांबरी यांनी मुलीची जबाबदारी घेतली. मात्र अवघ्या चार वर्षांच्यामुलीला “प्रात:विधी” म्हणजेच शिष्टाचार आणि वागणुकीचे मूलभूत नियम समजत नाहीत, या कारणावरून वारंवार मारहाण केली जात होती. मारहाणीमध्येच तिचा मृत्यू झाला. हत्या झाल्यानंतर मृतदेह गोणीत ठेवून त्यावर गादी गुंडाळली आणि कर्जत-भिवपुरीतील चिंचवली गावाजवळच्या जंगलात फेकून दिला.

आत्याला आला संशय अन् केली तक्रार

काही दिवसांनी मुलीच्या आत्याने तिला सांभाळण्यासाठी मागणी केली असता आरोपी कांबरी दाम्पत्याने मोबाईल बंद करून पळ काढला. त्यामुळे आत्याने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

अपर्णा व प्रथमेश कांबरी हे दोघेही गेल्या सात-आठ महिन्यांपासून आरोपी पोलिसांना चकवा देत होते. मात्र बराच तपास केल्यानंतर पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी दोघांना रायगड जिल्ह्यातील चिंचवली गावातून अटक केली.

दोन्ही आरोपींना 11 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे. जंगलात फेकलेला मृतदेह ताब्यात घेऊन फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आला आहे.

Follow Us
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?