पत्नी आणि सासूवर गोळ्या झाडल्या, नंतर थेट पोलिसांना कॉल, म्हणाला….

देशाची राजधानी दिल्लीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपली पत्नी आणि सासूची हत्या केली आहे. या हत्येमागे फार काही मोठं कारण नाही. पण तरीही आरोपीने रागाच्या भरात आपल्या पत्नी आणि सासूवर गोळ्या झाडून हत्या केली.

पत्नी आणि सासूवर गोळ्या झाडल्या, नंतर थेट पोलिसांना कॉल, म्हणाला....
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Oct 10, 2021 | 5:16 PM

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपली पत्नी आणि सासूची हत्या केली आहे. या हत्येमागे फार काही मोठं कारण नाही. पण तरीही आरोपीने रागाच्या भरात आपल्या पत्नी आणि सासूवर गोळ्या झाडून हत्या केली. विशेष म्हणजे आरोपीने दोघांची हत्या केल्यानंतर पोलिसांना समोरुन फोन केला. पोलिसांना त्याने आपण आपल्या पत्नी आणि सासूची हत्या केल्याची कबुली दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

हत्येमुळे परिसरात एकच खळबळ

संबंधित घटना ही दिल्लीच्या हरिदास नगर परिसरात नारनूम पार्क येथे घडली. आरोपीचं नाव महेश असं असल्याची माहिती समोर आली आहे. तर त्याच्या मृतक पत्नीचं नाव निधी (वय 21) आणि मृतक सासूचं वीरो (वय 55) असं आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी आपल्या पत्नी आणि सासूसोबत इतकं निर्घृणपणे कसा वागू शकतो? असा प्रश्न स्थानिकांकडून व्यक्त केला जातोय.

आरोपीने हत्या का केली?

दरम्यान, या घटनेमागील नेमकं कारण काय? असा प्रश्न अनेकांना सतावत होता. पण पोलिसांनी केलेल्या तपासात खरं कारण समोर आलं आहे. आरोपी आपल्या पत्नी आणि सासूवर नाराज होता. कारण त्या दोघी त्याला घरजावाई म्हणून सारख्या हिणवत असायच्या. त्यामुळे रागात त्याने आपल्या पत्नी आणि सासूची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. दोघांच्या हत्येनंतर त्याने पोलिसांना कॉल करत आपल्या हत्येची कबुली दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं. तसेच दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पाच वर्षांपूर्वी लग्न

आरोपी महेश हा कार खरेदी-विक्रीच्या दलालीचं काम करतो. त्याचं पाच वर्षांपूर्वी निधीसोबत प्रेमविवाह झाला होता. तो आपल्या सासूच्या घरी पत्नीसह राहत होता. त्यामुळे सासू आणि पत्नीकडून त्याला वारंवार घरजावई म्हणून हिणवलं जात होतं. अखेर आरोपीने रागात दोघांची हत्या केली.

उत्तर प्रदेशात साधूची हत्या

दरम्यान, उत्तर प्रदेशातही एक हत्येची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील कोतवाली ग्रामीण भागातील नागला जगरुप गावाची आहे. गढी तालुक्यातील रहिवासी असलेले 52 वर्षीय साधू किरपाल सिंह हे एका महिन्यापूर्वीच मंदिरात राहायला आले होते. काल रात्री आरोपी तरुण त्यांच्याकडे आला आणि त्याने त्यांच्यासोबत जेवण केले. त्यानंतर आरोपीने साधू किरपाल सिंह यांची कुऱ्हाडीने वार करुन निर्घृण हत्या केली आणि घटनास्थळावरून पळून गेल्याचा आरोप आहे. गावातील लोक सकाळी मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेले असता साधूचा मृतदेह मंदिराच्या आवारात पडलेला आढळला.

आरोपीकडून हत्येची कबुली

साधूच्या हत्येची बातमी मिळतातच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. वरिष्ठ पोलीस अधीक्षक उदय शंकर सिंह हे मोठ्या पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी आले. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपीने साधूची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

वीस वर्षांपासून संधीची प्रतीक्षा

20 वर्षांपूर्वी साधू किरपाल सिंह यांनी आपल्या वडिलांचा खून केला होता, ज्याचा बदला घेण्यासाठी मी गेल्या 20 वर्षांपासून वाट पाहत होतो, असा दावा आरोपीने केला आहे. जेव्हा मला एका साधूच्या वेशात मंदिरात राहणाऱ्या किरपालबद्दल कळले तेव्हा त्याच्याशी मैत्री करुन संधी मिळताच मी त्याचा खून केला, असा दावाही त्याने केला.

हेही वाचा :

आपलं कोण..परकं कोण? नातवाच्या मित्राचाच आजीच्या सोन्यावर डल्ला, औरंगाबादेत सुशिक्षित तरुणाचा प्रताप

नाशिकमध्ये बँक मॅनेजरने 14 लाख हडपले; ग्राहकाची पंचवटी पोलिस ठाण्यात धाव, गुन्हा दाखल

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.