AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विनयभंग केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकाविरोधात मोर्चा, गुन्हा दाखल करण्याची मागणी

आरपीआय (RPI) तसेच कॉंग्रेस समर्थक शेकडो महिलांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. बार्शीचे पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांनी एका महिलेचा विनयभंग केला असल्याचा आरोप आहे.

विनयभंग केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकाविरोधात मोर्चा, गुन्हा दाखल करण्याची मागणी
नालासोपाऱ्यात रेल्वे स्थानकात महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक
| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Feb 25, 2022 | 8:26 PM
Share

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये कॉंग्रेस (Congress) पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याचा विनयभंग (molestation) केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. याप्रकरणी आरपीआय (RPI) तसेच कॉंग्रेस समर्थक शेकडो महिलांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. बार्शीचे पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांनी एका महिलेचा विनयभंग केला असल्याचा आरोप आहे. तसेच ते नेहमीच अरेरावीची भाषा वापरत असतात. त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात यावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज बार्शी तहसील कार्य़ालसमोर मोर्चा काढत निषेध नोंदवलाय. काँग्रेसच्या एका महिला कार्यकर्त्यानी आपल्यावर पोलिस निरीक्षक शेळके यांनी विनयभंग केल्याचा आरोप यावेळी केला. तसेच त्यांच्याविरोधात गु्न्हा नोंद करुन तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महिलेचा जबाब नोंदवला होता मात्र त्याबाबत अद्याप गुन्हा नोंद झालेला नाही.

प्रहार संघटना पोलिसांच्या बाजुने

दरम्यान पोलिसांच्या विरोधात सुरु असलेलं आंदोलन पाहून प्रहार संघटनेच्यावतीने पोलिसांच्या सर्मथनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी संबधित आंदोलन करणाऱ्या संघटनेने महिलांना पैसे देऊन मोर्चात सहभागी केले आहे असा आरोप प्रहारच्या संजीवनी बारंगुळे यांनी केला. तसेच पोलिस निरीक्षक शेळके बार्शीत आल्यापासून कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न कमी झाले आहेत. एखादा अधिकारी चांगला काम करत असताना खोटे आरोप करुन आंदोलन करणे चुकीचे आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक शेळके यांच्या समर्थनार्थ आम्ही आहोत असेही मत प्रहारच्या पदाधिकारी संजीवनी बारंगुळे यांनी व्यक्त केले.

दोन्ही बाजुने मोर्चे निघाल्याने संभ्रम

दोन्ही बाजुने मोर्चे निघाल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण होते. एका बाजुने गुन्हा दाखल करण्याची मागणी तर दुसऱ्या बाजुने समर्थन त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. एका पोलीस अधिकाऱ्यावरच असे आरोप झाल्याने पोलीस याबाबत आता काय निर्णय घेणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पोलीस ठाण्याच रोज अनेकांची ये जा असते पोलिसांच्या भाषेबाबत अनेकदा तक्रारी होता. तोच प्रकार बार्शीत पुन्हा समोर आला आहे. याप्रकरणात कुणाचे आरोप खरे हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल. मात्र त्यासाठी या प्रकरणाची कसून चौकशी होणे गरजेचे आहे. यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागणार हे मात्र स्पष्ट झाले आहे. एका पोलीस अधिकाऱ्यावर असे आरोप झाल्याने पोलीस खात्यातही खळबळ माजली आहे.

‘शी’ला जातो म्हणाला आणि शोचालयातूनच आरोपी पळाला! कुठं घडली घटना?

Video : पनवेलच्या वाघेज पावभाजी सेंटरमध्ये चोर, सीसीटीव्ही असतानाही कसा डल्ला मारला? पाहा

पळवून आणलेल्या मुलीसाठी भांडले, एकाने दुसऱ्याला यमसदनी धाडले; कल्याणमधील धक्कादायक घटना

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली