AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटाची सुरक्षा कमी केल्याचा वाद आता उच्च न्यायालयात, फौजदारी रिट याचिका दाखल

या याचिकेत प्रतिवादी म्हणून राज्याचे वर्तमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे गृहसचिव आणि ठाणे जिल्ह्याचे पोलीस आयुक्त यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

ठाकरे गटाची सुरक्षा कमी केल्याचा वाद आता उच्च न्यायालयात, फौजदारी रिट याचिका दाखल
Image Credit source: Google
| Edited By: | Updated on: Jan 02, 2023 | 8:28 PM
Share

मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेत्यांची सुरक्षा कमी केल्याचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. त्यामुळे राज्यात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट हा संघर्ष काही कमी होताना दिसत नाही. ठाकरे गटाचे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. त्यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांची सुरक्षा वाढवून देण्यात यावी, अशी मागणी करत फौजदारी याचिका दाखल केली गेली आहे. या याचिकेवर 9 जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

शिवसेनेत फूट पडल्याने सुरक्षेत घट केल्याचा आरोप

शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन गट निर्माण झाले आहेत. पहिला उद्धव ठाकरे गट तर दुसरा एकनाथ शिंदे असे दोन गट तयार झाले आहेत. राजन विचारे यांनी आरोप केला आहे की, ते शिंदे गटात गेले नसल्याने त्यांच्या सुरक्षेत घट करण्यात आली आहे.

याचिकेवर 9 जानेवारी रोजी सुनावणी

राजन विचारे यांनी अॅड. नितीन सातपुते यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात आज सदर याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेवर न्यायमूर्ती अभय गडकरी यांच्या खंडपीठासमोर 9 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.

विशेष बाब म्हणजे या याचिकेत प्रतिवादी म्हणून राज्याचे वर्तमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे गृहसचिव आणि ठाणे जिल्ह्याचे पोलीस आयुक्त यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

काही महिन्यांपूर्वी ठाण्यात झाला होता राडा

याचिकेत खासदार राजन विचारे यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांना तात्काळ सुरक्षा देण्याची मागणी केली गेली आहे. काही महिन्यांपूर्वी शिंदे विरुद्ध ठाकरे गटात ठाण्यात राडा झाला होता.

याप्रकरणी राजन विचारे यांच्यासह ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांविरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचिकेत असा दावा करण्यात आलाय की, राजन विचारे यांना पक्षाच्या आणि सामाजिक कामानिमित्त अनेक ठिकाणी जावा यावा लागतो.

ठाण्यातली घटना पाहता विचारे यांच्या जीवाला धोका आहे. म्हणून त्यांना सुरक्षा देण्याची मागणी करणारे पत्रही ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना देण्यात आले होते. मात्र काहीच कारवाई करण्यात आली नाही म्हणून अखेर या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.