AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिग्नलवर पैसे मागण्याचा वाद, तृतीयपंथींनी एकाला भररस्त्यात भोसकलं

सिग्नलवर पैसे मागण्याच्या वादाततून दोन तृतीयपंथीने एका तृतीयपंथीला भोसकलं. मुंबईजवळ दहीसर परिसरात बुधवारी 28 जुलैला संध्याकाळी हा सर्व थरार झाला.

सिग्नलवर पैसे मागण्याचा वाद, तृतीयपंथींनी एकाला भररस्त्यात भोसकलं
Borivali Police
| Edited By: | Updated on: Jul 29, 2021 | 7:32 AM
Share

मुंबई : सिग्नलवर पैसे मागण्याच्या वादाततून दोन तृतीयपंथीने एका तृतीयपंथीला भोसकलं. मुंबईजवळ दहीसर परिसरात बुधवारी 28 जुलैला संध्याकाळी हा सर्व थरार झाला. पैसे मागण्याच्या वादातून चार तृतीयपंथींची वादावादी झाली. त्याचं पर्यवसन हाणामारीत झालं. या चारपैकी दोघांनी एका तृतीयपंथीवर थेट चाकूहल्ला केला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

मुंबईतील दहिसर पश्चिमेत एच एच,बी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुधीर फडके चौक आहे. दहीसर आणि बोरिवली दरम्यान असलेल्या राम मंदिर सिग्नलजवळ तृतीयपंथींच्या हद्दीवरुन राडा झाला. इथे 4 तृतीयपंथीचं सिग्नलवर पैसे मागण्यावरून भांडण झालं. या वादामध्ये दोन तृतीयपंथींनी एका तृतीयपंथीवर चाकूने हल्ला केल्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला. या चाकूहल्ल्यामुळे रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता.

या घटनेची माहिती मिळताच रात्री 10:30 च्या सुमारास मोठ्या संख्येत तृतीयपंथी सुधीर फडके चौकाच्या सिग्नलवर जमा झाले. तृतीयपंथींनी गर्दी केल्यामुळे काही काळासाठी इथे ट्रॅफिक जाम झालं. मात्र मुंबई पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन, मृतदेह ताब्यात घेतला.

पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठवला. या घटनेमध्ये मुंबई पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून अवघ्या 2 तासाच्या आत 2 तृतीयपंथींना अटक केली आहे.

संबंधित बातम्या 

सुपारी, मर्डर सारख्या गंभीर गुन्ह्यांचा आरोपी, चाहत्यांकडून केडीएमटी बस स्टॉपवर वाढदिवसाचा बॅनर

बंदूक हातात घेतलेला फोटो स्टेटसला ठेवला, पिंपरी चिंचवडच्या गुंडाविरोधी पथकाकडून 25 वर्षीय भाईला बेड्या

फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.
छगन भुजबळांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र! पत्रात काय?
छगन भुजबळांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र! पत्रात काय?.
पंतप्रधानांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला गती मिळाली! फडणवीसांचं मत
पंतप्रधानांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला गती मिळाली! फडणवीसांचं मत.
संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा; लाखो भाविकांची शेगावात मांदियाळी
संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा; लाखो भाविकांची शेगावात मांदियाळी.
प्रकट दिनानिमित्त गजानन महाराजांच्या मंदिरात भक्तांची गर्दी
प्रकट दिनानिमित्त गजानन महाराजांच्या मंदिरात भक्तांची गर्दी.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरमध्ये दाखल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरमध्ये दाखल.
19 ते 25 वर्षात लग्न, 3 मुलं व्हावी असं शास्त्र सांगतं - मोहन भागवत
19 ते 25 वर्षात लग्न, 3 मुलं व्हावी असं शास्त्र सांगतं - मोहन भागवत.
संभाजीनगरात CTET केंद्रावर दागिने काढायला लावल्याने वाद!
संभाजीनगरात CTET केंद्रावर दागिने काढायला लावल्याने वाद!.