Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan | बदनामीच्या खटल्याआडून जमिनीची लढाई, सलमान खानवर शेजाऱ्याचे दबंग आरोप सुरुच

सलमान खानतर्फे मुंबई सत्र न्यायालयात केतन कक्कड यांच्यावर बदनामीसह अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मुंबई सत्र न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे.

Salman Khan | बदनामीच्या खटल्याआडून जमिनीची लढाई, सलमान खानवर शेजाऱ्याचे दबंग आरोप सुरुच
सलमान खान
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 6:35 AM

मुंबई : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan) याने पनवेल फार्महाऊसच्या (Panvel Farmhouse) शेजारी राहणाऱ्या केतन कक्कड यांच्यावर मानहानीचा दावा (Defamation Case) दाखल केला आहे. बुधवारी सत्र न्यायालयात या प्रकरणी ऑनलाईन सुनावणी झाली. यावेळी केतन कक्कड यांच्या वकील आणि वरिष्ठ कायदेतज्ज्ञ आभा सिंह यांनी कोर्टाला सांगितले की, सलमानला केतन कक्कड यांची जमीन स्वस्तात हवी होती. जमिनीसाठी ही लढाई सुरु असल्यामुळे सलमानने मानहानीचा खटला दाखल केल्याचा आरोप कक्कडच्या वकिलांतर्फे करण्यात आला. दोन शेजार्‍यांमध्ये जमिनीबाबत वाद होता, बदनामीच्या खटल्याच्या नावाखाली ही जमिनीसाठी लढाई आहे. सलमान खानने ही याचिका स्वच्छ हेतूने न्यायालयात दाखल केली नाही, त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात यावी असा युक्तिवाद केतन कक्कड यांच्या वकील आभा सिंह यांनी केला. आज पुन्हा या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

काय आहे प्रकरण?

सलमान खानतर्फे मुंबई सत्र न्यायालयात केतन कक्कड यांच्यावर बदनामीसह अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मुंबई सत्र न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे.

केतन कक्कड यांच्या घरासमोर असलेल्या विजेच्या खांबावरुन वीज घेण्यात आली आहे, मात्र सलमान खानने हा खांब देखील तोडून टाकला आहे. तसेच सलमान खानने घराच्या समोरच मोठे गेट बसवले आहे, त्यामुळे केतन कक्कड यांना या गेटमधून प्रवास करता येत नाही, तसेच त्या ठिकाणी असलेल्या मंदिरात दर्शनाला देखील जाता येत नाही. अशा प्रकारे केतन क्ककड यांना सलमान खानकडून विनाकारण त्रास देण्यात येत आहे, असा आरोप कक्कड यांच्या वकील आभा सिंह यांनी यावेळी केला.

बदनामीचे आरोप खोटे, कक्कड यांचा दावा

सलमान खानने केतन कक्कड यांच्यावर बदनामी केल्याचे जे आरोप लावले आहेत, ते खोटे आहेत. कारण कक्कड यांनी कुठेही सलमान खानचे नाव घेतलेला नाही. त्यांनी आपलं म्हणणं मांडलं आहे, असाही दावा वकिलांनी केला. डी कंपनीसोबत संबंध असल्याचा आरोप असो, किंवा चाईल्ड ट्रॅफिकिंग किंवा इतर आरोप असो, कक्कड यांनी कुठेही सलमानचं नाव घेऊन आरोप केले नाही, असा युक्तिवादही आभा सिंग यांच्यातर्फे करण्यात आला.

संबंधित बातम्या :

“स्वत: ला समजतोस कोण, असे 100 सलमान खान गल्ली झाडायला उभे करेन”

सलमान फार्म हाऊस म्हणजे गुन्हेगारीचा अड्डा?, कलाकारांचे मृतदेह, लहान मुलांची तस्करी, भाईजानविरूद्ध आरोपांची राळ!

सलमान खान रोज रात्री 12 वाजता मला फोन करतो, मी पण त्याचा फोन घेते, लारा दत्ताचा गौप्यस्फोट

'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.
प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?
प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?.
हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही - मंत्री उदय सामंत
हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही - मंत्री उदय सामंत.
'खरंच एकत्र यायचंय की..', ठाकरेंच्या युतीवर भास्कर जाधवांचं वक्तव्य
'खरंच एकत्र यायचंय की..', ठाकरेंच्या युतीवर भास्कर जाधवांचं वक्तव्य.
VIDEO: सातरच्या आजीचा नादखुळा.. 65व्या वर्षी फिरवतेय सुपरफास्ट रिक्षा
VIDEO: सातरच्या आजीचा नादखुळा.. 65व्या वर्षी फिरवतेय सुपरफास्ट रिक्षा.