मंदिरात जाताना पहाटे धारदार शस्त्राने हत्या, विरारच्या बिल्डरच्या हत्येचं गूढ उलगडलं

निशांत कदम या बिल्डरची सोमवारी पहाटे हत्या करुन पाच जण फरार झाले होते. विरार पूर्व फुलपाडा गांधी चौकात पहाटे तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास मंदिरात जाणाऱ्या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता.

मंदिरात जाताना पहाटे धारदार शस्त्राने हत्या, विरारच्या बिल्डरच्या हत्येचं गूढ उलगडलं
विरारमध्ये बिल्डरची हत्या
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 1:51 PM

विरार : विरारमधील बिल्डरच्या हत्या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून चौघे जण अद्यापही फरार आहेत. जुन्या वादातून बांधकाम व्यावसायिकाची हत्या झाली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. चंद्रकांत चौहान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

निशांत कदम या बिल्डरची सोमवारी पहाटे हत्या करुन पाच जण फरार झाले होते. विरार पूर्व फुलपाडा गांधी चौकात पहाटे तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास मंदिरात जाणाऱ्या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता.

नेमकं काय घडलं होतं?

विरार पूर्व फुलपाडा परिसरातील गांधी चौक येथे सोमवारी पहाटे तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. विरारमधील 31 वर्षीय बांधकाम व्यावसायिक निशांत कदम पहाटे पापडखिंड येथील मंदिरात पूजेसाठी जात होता. यावेळी चौधरीवाडी सहकार नगर येथील एकता कम्पाउंडच्या बाजूला चिंचेच्या झाडाजवळ दबा धरून बसलेल्या अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर धारदार हत्याराने वार केले होते.

निशांत कदम याची निर्घृणपणे हत्या करुन आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले होते. विरार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतला होता. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आल्याची माहिती विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली होती.

हत्येचं कारण उलगडलं

दरम्यान, जुन्या वादातून बिल्डर निशांत कदमची हत्या झाली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली असून चौघे जण अद्यापही फरार आहेत. चंद्रकांत चौहान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

जेलमधून सुटलेल्या जावयाकडून सासूची हत्या

दुसरीकडे, तुरुंगातून सुटल्यानंतर अवघ्या दोन दिवसातच तरुणाने आपल्या सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील येरवडा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर 42 वर्षीय जावयाने मुंबईत येऊन आपल्या सासूबाईंचा जीव घेतला. बायकोचा ठावठिकाणा सांगण्यास सासूने नकार दिल्याच्या रागातून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

आरोपी अब्बास शेखला दरोडा टाकल्याच्या प्रकरणात 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. गेल्या आठवड्यात त्याची पुण्याच्या येरवडा तुरुंगातून सुटका झाली. दोन दिवसांनंतर त्याने मुंबई गाठली. पत्नीचा नवा पत्ता जाणून घेण्यासाठी शेख गेल्या आठवड्यात दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास सासूच्या घरी गेला होता.

डोक्यावर फरशीने अनेक वेळा वार

सासूने तुरुंगाबाहेर आलेल्या जावयाला लेकीचा पत्ता देण्यास नकार दिला. त्यामुळे घरातच दोघांमध्ये मोठा वादविवाद झाला. त्यानंतर, चिडलेल्या जावयाने घरातच तिच्या डोक्यावर फरशीने अनेक वेळा वार करुन तिची हत्या केल्याचा आरोप आहे. वृद्ध महिला राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्यामुळे मुंबईतील विलेपार्ले भागात गेल्या आठवड्यात एकच खळबळ उडाली होती.

हरियाणातील सामूहिक हत्याकांडाचा उलगडा

दरम्यान, हरियाणाच्या रोहतकमधील प्रॉपर्टी डीलर प्रदीप मलिक उर्फ बबलू पहलवान, त्याची पत्नी बबली, मुलगी तमन्ना उर्फ ​​नेहा आणि सासू रोशनी यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. मुलगा अभिषेकच्या समलैंगिक संबंधांना कुटुंबाने विरोध केल्याने आणि सेक्स चेंज ऑपरेशनसाठी पैसे न दिल्याने त्याने चौघांची हत्या केल्याचा आरोप आहे. एकाच कुटुंबातील चौघांच्या हत्येने देशभरात खळबळ उडाली होती.

संबंधित बातम्या :

बहिणीची छेड काढल्याचा राग, पुण्यात भावाकडून 16 वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या

चिंचेच्या झाडामागे दबा धरला, मंदिरात जाताना बिल्डरची पहाटे तीन वाजता हत्या, विरारमध्ये खळबळ

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.