AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरा-बायकोच्या आड येतंय रात्री-अपरात्रीचं चॅटिंग! 6 महिन्यातली चिंताजनक आकडेवारी एकदा बघाच

Mobile Chatting : सहा महिन्यात एकूण 455 तक्रारी दाखल

नवरा-बायकोच्या आड येतंय रात्री-अपरात्रीचं चॅटिंग! 6 महिन्यातली चिंताजनक आकडेवारी एकदा बघाच
कुतूहलापोटी चॅटिंग करणे डॉक्टरला पडले महागातImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jul 13, 2022 | 10:10 AM
Share

नवरा बायको म्हटलं की त्यांच्यात खटके (Husband Wife Dispute) उडणारच. पण खटके उडण्याचं आणि ते खटके चक्क पोलिसांपर्यंत घेऊन जाण्याचं प्रमाण कमालीचं वाढलं आहे. गेल्या सहा महिन्यातल्या आकडेवारीनं नवरा बायकोच्या (Husband Wife relation) नात्यातील भांडणांचं प्रमुख कारण हे सोशल मीडिया ठरत असल्याचं अधोरेखित होताना पाहायला मिळतंय. व्हॉट्सअप, फेसबुक यामुळे नवरा बायको यांच्यामधील संवादावर परिणाम होतोय. एकीकडे जग जवळ आलंय, पण नवरा बायकोचं नातं आणि त्यांच्यातला संवाद रात्री अपरात्रीच्या चॅटिंगने (WhatsApp Chatting) बिघडत चाललाय. ठाणे पोलिसांकडे आलेल्या गेल्या सहा महिन्यातील तक्रारी काळजी वाढवण्याऱ्या आहेत. ठाणे शहर पोलिसांच्या भरोसा सेलकडे एकूण 455 तक्रारी गेल्या सहा महिन्यांत दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यातील 21 जणांचे संसार वाचवण्यास यशही आलंय.

चिंताजनक आकडेवारी

2022 या वर्षातील पहिल्या सहा महिन्यात एकूण 455 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यातील 362 प्रकरण प्रलंबित आहे. तर 21 प्रकरणांत दाम्पत्यांचं समुपदेशन करुन त्यांचे संसार नव्याने फुलवण्यात भरोस सेलला यश आलंय.

2 घटना आणि वाद मिटवण्यात यश

अनेक प्रकरणांपैकी दोन प्रकरणांबाबत माहितीही समोर आली आहे. यापैकी एका प्रकरणात पती रात्री सोशल मीडियात व्यस्त असायचा. तर दुसऱ्या प्रकरणात पती घरातील कामावरुन पत्नीला सतत मारहाण करत होता. दुसऱ्या प्रकरणात महिलेला तिची सासू आणि नणंदही सतत वाद घालायच्या. पण या दोन्ही प्रकरणात दाम्पत्याचं समुपदेशन करुन दोन्ही प्रकरणात संसार वाचवण्यास भरोस सेलला यश आलंय. पत्नी पत्नी यांच्यात होत असलेल्या वादाच्या प्रमुख कारणांपैकी एख कारण मोबाईलचा अतिवापर असल्याचं दिसून आलं आहे. त्यातही एकमेकांनी व्हॉट्सअपला फोटो न ठेवणं किंवा एकमेकांना पासवर्डची माहिती न देणं, यातूनही खटके उडत असल्याची अनेक प्रकरण निदर्शनास आली आहेत.

दरम्यान, आणखी एका प्रकरणा पत्नी ही सारखी व्हॉट्सअपवरील मेसेजमध्येच व्यस्त असते. ती वेळच देत नाही, अशीही एक तक्रार समोर आली होती. वारंवार समज देऊनही बायको वेळच नाही, अशी तक्रार पोलिसांकडे देण्यात आलेली होती. दोन महिन्यांपूर्व देण्यात आलेल्या तक्रारीची तुफान चर्चाही झाली होती.

काय काळजी घ्यावी?

  1. नवरा-बायकोच्या नात्यामध्ये पती-पत्नीच्या आईवडिलांसाह बहिण, दीर यांच्याकडून होणारा हस्तक्षेप टाळावा
  2. सासू-सासरे, आई-वडील यांनी भावनिक आधार घ्याव
  3. वडीलधारे या नात्यानं पती-पत्नीमधील वाद मिटवण्यासाठी समुपदेशन करावं
  4. मोबाईलचा वापर शक्य तितकाच करावा, अनावश्यक वापर टाळावा
  5. पती-पत्नी यांनी एकमेकांशी संवाद ठेवण्याची नितांत गरज
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.