AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर दोन तरुणांचे मृतदेह सापडले, तरुणांसोबत काय घडलं?

काल सायंकाळी पोलीस कंट्रोल रुमला एक कॉल आला. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर धाव घेतली. समुद्रकिनाऱ्यावर पोहचताच पोलिसांना खळबळजनक दृश्य समोर दिसले.

Mumbai Crime :  वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर दोन तरुणांचे मृतदेह सापडले, तरुणांसोबत काय घडलं?
वर्सोवा बीचवर दोन तरुणांचे मृतदेह आढळलेImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Aug 04, 2023 | 9:24 AM
Share

मुंबई / 4 ऑगस्ट 2023 : मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर दोन तरुणांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तरुणांकडे सापडलेल्या आधारकार्डवरुन तरुणांची ओळख पटली आहे. दीपक बिश्त (वय 25) आणि हरदेव सिंग (वय 26) अशी मयत तरुणांची नावे आहेत. दोघेही तरुण मूळचे हरियाणातील रहिवासी आहेत. मात्र तरुणांचा मृत्यू नेमका कसा झाला? याबाबत अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. वर्सोवा पोलीस एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तरुणांचा अपघाती मृत्यू झाला की त्यांची हत्या झाली हे स्पष्ट होईल. पोलीस नातेवाईकांची चौकशी करत आहेत.

आधारकार्डवरुन तरुणांची ओळख पटवली

वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर दोन तरुणांचे मृतदेह असल्याची माहिती लाईफ गार्डने काल सायंकाळी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. दोन्ही मृतदेह 100 मीटरच्या अंतरावर पडले होते. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. तरुणांच्या खिशात त्यांचे आधारकार्ड आणि सिम कार्ड सापडले. त्यावरुन त्यांची ओळख पटली आणि ते हरियाणातील असल्याचे कळले. पोलिसांनी सिम कार्डमधील नंबरवरुन त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला.

शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे रहस्य उलगडेल

कुटुंबीयांशी संपर्क साधला असता दोघेही तरुण नागपूर आणि चेन्नई येथे कामाला असल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली. मग तरुण मुंबईत कसे आले? याबाबत पोलीस तपास करत आहेत. तरुणांच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या जखमी दिसत नाहीत. यामुळे तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला की त्यांचा घातपात झाला? याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासानंतर सर्व स्पष्ट होईल.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.