AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kadar Dighe : केदार दिघे यांच्यावरील आरोपांवर कोर्टातून मोठी अपडेट! बलात्काराच्या आरोपावर कोर्ट म्हणालं की…

केदार दिघे यांनी 1 ऑगस्ट रोजी ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुखपदी निवड करण्यात आलेली.

Kadar Dighe : केदार दिघे यांच्यावरील आरोपांवर कोर्टातून मोठी अपडेट! बलात्काराच्या आरोपावर कोर्ट म्हणालं की...
ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघेImage Credit source: tv9
| Updated on: Aug 10, 2022 | 1:26 PM
Share

मुंबई : केदार दिघे (Kedar Dighe News) यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. केदार दिघे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवरही कोर्टानं (Mumbai Session Court) महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. मुंबई सत्र न्यायालयात याप्रकरणी सुनावणी पार पडली असताना कोर्टानं म्हटलंय की, केदार दिघे यांच्यावर बलात्काराचा (Rape case) आरोप नाही, केवळ धमकीचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना अशा स्थितीत कोणत्याही कोठडीची आवश्यकता नाही. ते तपासाला सहकार्य करणार असल्याबाबत आश्वस्त करत असल्यामुळे त्यांना जामीन दिला जाऊ शकतो, असं कोर्टानं म्हटलंय. ठाणे जिल्हा शिवेसना प्रमुख केदार दिघे यांच्यावर बलात्कार आणि धमकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर केदार दिघे यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. त्यामुळे त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी अखेर त्यांचा अर्ज मान्य करण्यात आला आल्यानं मोठा दिलासा मिळालाय.

काय आहे प्रकरण?

केदार दिघे यांच्यावरती एका तरुणीनं धमकी दिल्याचा आरोप केला होता. दिघे यांच्या मित्रावर 23 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आलाय. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह एकूण सहा जणांवर गुन्हा नोंदवला होता. त्यात केदार दिघे यांचाही समावेश असून केदार दिघे यांना अटक करण्यात येईल, अशी शक्यता निर्माण झाली होती. अखेर आता केदार दिघे यांना दिलासा मिळाला असून त्याच्यावरील अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केलाय. तपासात सहाकार्य करण्याच्या अटीवर त्यांचा अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने मान्य केला आहे.

दिघेंनी नेमकं काय म्हटलं?

केदार दिघे यांनी 1 ऑगस्ट रोजी ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुखपदी निवड करण्यात आलेली. याच दिवशी केदार दिघे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीला गेले होते. तसंच नंतर त्यांनी शिवाजी मार्कवरही जात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी भेट दिली होती. दरम्यान, त्यांना एक फोन कॉल आला होता. हा फोन कॉल कामदार संघटनेच्या पदाधिकाऱ्याचा होता. या व्यक्तीने सहआरोपी आणि पीडिता यांच्यामध्ये वाद झाला असल्याची माहिती दिली. त्यानंतर पीडितेसोबत गैरवर्तन झाल्याचं कळलं, अशी माहितीही केदार दिघे यांनी कोर्टात दिली. दरम्यान, हे प्रकरण मिटवण्यासाठी पीडितेने सहआरोपींकडे पैशांची मागणी केल्याचा आरोपही केदार दिघे यांनी केला होता. पीडितेचं म्हणणं खोटं असून तिने केलेल्या आरोपात तत्थ्य नसल्याचाही दावा दिघे यांनी अटकपूर्व सामीनासाठी अर्ज करताना केला होता.

दुसरीकडे पोलिसांच्या वतीने हा जामीनअर्ज मान्य केला जाऊ नये, असा युक्तिवाद करण्यात आला. तपास आता महत्त्वाच्या टप्प्यामध्ये असून हा जामीन अर्ज मंजूर करु नये, असं पोलिसांनी म्हटलंय. मात्र दिघे हे तपासाला सहकार्य करतील, अशा अटीवर त्यांचा जामीनअर्ज मान्य करण्यात आलाय.

Follow Us
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.