AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील अब्दुल रहमान स्ट्रीटवर दुकानांना भीषण आग, सात ते आठ दुकाने जळून खाक

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले आहे.

मुंबईतील अब्दुल रहमान स्ट्रीटवर दुकानांना भीषण आग, सात ते आठ दुकाने जळून खाक
मस्जिद बंदर परिसरात अग्नीकल्लोळImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jan 07, 2023 | 10:59 PM
Share

मुंबई : मस्जिद बंदर परिसरातील अब्दुल रहमान स्ट्रीटवर दुकानांना आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सात ते आठ दुकानांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्नीशमन दलाला यश आले आहे. सध्या कुलिंगचे काम सुरु आहे. दरम्यान, आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.

सात ते आठ दुकाने आगीत खाक

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आग प्रथम एका दुकानात लागली. नंतर हळूहळू ती जवळपासच्या दुकानांपर्यंत पोहोचली आणि पाहता पाहता सुमारे 7 ते 8 दुकानांमध्ये ही आग पसरली.

आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश

अग्नीशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले आहे.

आगीचे कारण अद्याप अनभिज्ञ

ज्या ठिकाणी आग लागली ते सर्व ग्राउंड प्लस वन आणि चारची दुकान आहेत. आग नेमकी कशी लागली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. आग कशी लागली याचा तपास अग्निशमन दल आणि पोलीस करत आहेत.

नवी मुंबईतील रबाळेत पेपर कारखान्याला आग

नवी मुंबईतील रबाळे येथे पेपर कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला तर अग्नीशमन दलाचे दोन जवान जखमी झाले. जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.