AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Murder : कांदिवलीत जुन्या वादातून तरुणाची हत्या, सहा आरोपींना अटक

मयत दीपक राजभर हा बिहारी टेकडी पोईसर येथील रहिवासी असून त्याचे दहा दिवसांपूर्वी आरोपींसोबत भांडण झाले. यावेळी सर्वांनी एकमेकांना मारहाणही केली होती.

Mumbai Murder : कांदिवलीत जुन्या वादातून तरुणाची हत्या, सहा आरोपींना अटक
कांदिवलीत जु्न्या वादातून तरुणाची हत्याImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 28, 2022 | 9:18 PM
Share

मुंबई : जुन्या वादातून धारदार हत्याराने वार करुन एका तरुणाची हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना कांदिवली पूर्वेतील पोईसरमध्ये ही घटना घडली आहे. दीपक राजभर (30) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्या पोलिसांनी सहा आरोपींना अटक (Arrest) केली आहे. जुन्या वादा (Old Dispute)च्या रागातून ही हत्या झाल्याची माहिती कळते. आरोपी आणि मयत तरुण एकमेकांना ओळखतात. दरम्यान, आरोपी आणि मयतामध्ये नेमक्या कोणत्या कारणावरुन वाद झाला होता, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

जुन्या वादातून तरुणाची हत्या

मयत दीपक राजभर हा बिहारी टेकडी पोईसर येथील रहिवासी असून त्याचे दहा दिवसांपूर्वी आरोपींसोबत भांडण झाले. यावेळी सर्वांनी एकमेकांना मारहाणही केली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र हे भांडण कोणत्या कारणावरुन झाले होते हे अद्याप कळू शकले नाही. याचाच राग मनात धरुन आरोपींनी धारदार हत्याराने वार करुन दीपकची हत्या केली. समतानगर पोलिसांना 25 जुलै रोजी परिसरात एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता मृतदेहाच्या अंगावर जखमेच्या खुणा होत्या. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला.

पोलिसांनी परिसरात चौकशी केली असता हा मृतदेह बिहारी टेकडी परिसरात राहणाऱ्या दीपक राजभरचा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हत्येचा तपास सुरु केला. तपासाअंती दीपकच्या ओळखीतील व्यक्तींनीची त्याची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. अधिक तपास केला असता पोलिसांना आरोपींची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सहाही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सध्या पोलीस सर्व संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. (Youth killed due to old dispute in Kandivali, six accused arrested)

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.