AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : हत्येच्या आरोपात सात वर्षापासून फरार होता, पण एक चूक नडली अन् आरोपी थेट तुरुंगात

हत्येचा गुन्हा करुन आरोपी सात वर्षे फरार होता. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी जंग जंग पछाडले. पण एका चुकीमुळे आरोपीच पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

Mumbai Crime : हत्येच्या आरोपात सात वर्षापासून फरार होता, पण एक चूक नडली अन् आरोपी थेट तुरुंगात
हत्येच्या आरोपात फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यातImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 15, 2023 | 5:46 PM
Share

मुंबई : आपसातील वादातून तिघांनी मिळून एका व्यक्तीला बांबूने बेदम मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या त्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गेली सात वर्षे पोलिसांना गुंगारा देत होता. पण एका लॉटरीमुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला सापळा रचून कांदिवलीतून अटक केली आहे. अजय कुराडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला अटक करुन पोलिसांनी पुन्हा त्याची कोठडीत रवानगी केली आहे. याबाबत पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.

काय आहे प्रकरण?

आरोपी 2015 मध्ये झालेल्या हत्याकांडातील मुख्य आरोपी होता. काही कारणातून आरोपीसह अन्य दोघांनी मिळून दिपक कदम नावाच्या व्यक्तीची हत्या केली होती. मयतासोबत वाद झाल्यानंतर तिन्ही आरोपींनी त्याला बांबूने मारहाण केली होती. या मारहाणीत कदम हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.

लॉटरीसाठी आला अन् तुरुंगात गेला

यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करत तिन्ही आरोपींना अटक करत पोलिसांनी तुरुंगात धाडले होते. मात्र काही दिवसांनी मुख्य आरोपी जामिनावर सुटून बाहेर आला. त्यानंतर पोलिसांना चकमा देऊन फरार झाला. गेली सात वर्षे नाव बदलून तो विरारमध्ये राहत होता. मात्र कांदिवलीतील घराच्या एसआरएच्या लॉटरीसाठी आरोपी कांदिवलीत आला. तो कांदिवलीत येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून आरोपीला बेड्या ठोकल्या.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...