AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : हत्येच्या आरोपात सात वर्षापासून फरार होता, पण एक चूक नडली अन् आरोपी थेट तुरुंगात

हत्येचा गुन्हा करुन आरोपी सात वर्षे फरार होता. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी जंग जंग पछाडले. पण एका चुकीमुळे आरोपीच पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

Mumbai Crime : हत्येच्या आरोपात सात वर्षापासून फरार होता, पण एक चूक नडली अन् आरोपी थेट तुरुंगात
हत्येच्या आरोपात फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यातImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 15, 2023 | 5:46 PM
Share

मुंबई : आपसातील वादातून तिघांनी मिळून एका व्यक्तीला बांबूने बेदम मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या त्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गेली सात वर्षे पोलिसांना गुंगारा देत होता. पण एका लॉटरीमुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला सापळा रचून कांदिवलीतून अटक केली आहे. अजय कुराडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला अटक करुन पोलिसांनी पुन्हा त्याची कोठडीत रवानगी केली आहे. याबाबत पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.

काय आहे प्रकरण?

आरोपी 2015 मध्ये झालेल्या हत्याकांडातील मुख्य आरोपी होता. काही कारणातून आरोपीसह अन्य दोघांनी मिळून दिपक कदम नावाच्या व्यक्तीची हत्या केली होती. मयतासोबत वाद झाल्यानंतर तिन्ही आरोपींनी त्याला बांबूने मारहाण केली होती. या मारहाणीत कदम हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.

लॉटरीसाठी आला अन् तुरुंगात गेला

यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करत तिन्ही आरोपींना अटक करत पोलिसांनी तुरुंगात धाडले होते. मात्र काही दिवसांनी मुख्य आरोपी जामिनावर सुटून बाहेर आला. त्यानंतर पोलिसांना चकमा देऊन फरार झाला. गेली सात वर्षे नाव बदलून तो विरारमध्ये राहत होता. मात्र कांदिवलीतील घराच्या एसआरएच्या लॉटरीसाठी आरोपी कांदिवलीत आला. तो कांदिवलीत येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून आरोपीला बेड्या ठोकल्या.

Follow Us
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं.
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय.
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी.
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?.
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत...
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत....
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?.
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव.
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज.
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच....
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच.....
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस.