AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेमाला अंतिम निरोपाची प्रतिक्षा! 72 तासापासून बॉयफ्रेंडच्या दरवाजावर गर्लफ्रेंडचा मृतदेह; अंत्यसंस्कारासाठी कोणीच येईना

गेल्या तीन दिवसांपासून गर्लफ्रेंडचा मृतदेह हा प्रियकराच्या घराबाहेर होता. गावकरी अंत्यसंस्कारासाठी तयार नाहीत. पोलीस समजावण्याचा प्रयत्न करत आहेत.

प्रेमाला अंतिम निरोपाची प्रतिक्षा! 72 तासापासून बॉयफ्रेंडच्या दरवाजावर गर्लफ्रेंडचा मृतदेह; अंत्यसंस्कारासाठी कोणीच येईना
प्रतिकात्मक छायाचित्र Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Mar 13, 2025 | 5:23 PM
Share

बिहारमधील समस्तीपूरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. गेल्या ३ दिवसांपासून एका मुलीच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आलेले नाहीत. मृतदेहातून अक्षरश: दुर्गंधी येत आहे. तरीही गावकरी अंत्यसंस्कारासाठी तयार नाहीत. गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस अधिकारीही गावकऱ्यांना सतत समजावून सांगत आहेत, मात्र ते त्यांच्या मतावर ठाम आहेत. स्थानिक प्रमुखांनीही त्यांच्या बाजूने पुढाकार घेतला आहे. मात्र, मृतदेहावर अंतिम संस्कार होऊ शकले नाहीत.

मनीषा कुमारी असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. तिचे वय 26 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. ही तरुणी मुझफ्फरपूर जिल्ह्यातील हट्टा मल्ला टोली येथील रहिवासी होती. समस्तीपूरच्या गंगौरा येथील बाबुलसोबत तिचे प्रेमसंबंध होते. दरम्यान, मुलीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. गेल्या ३ दिवसांपासून प्रियकर बाबुलच्या घराबाहेर तिचा मृतदेह घेऊन गावकरी बसले आहेत. ते पाहून बाबुल आणि त्याचे कुटुंबीय घरातून पळून गेले आहेत.

वाचा: बॅग घेऊन जात होती… पोलिसांनी रोखलं, बॅग तपासताच मिळाली अशी गोष्ट… बोबडीच वळली

9 मार्च रोजी मनीषाचा मृतदेह मुझफ्फरपूरच्या मल्ला टोला येथील घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. ती आपल्या मुलीसह घरी एकटीच राहत होती. समस्तीपूरच्या बाबुलसोबत तिचे प्रेमसंबंध होते. मुलीनेच गावकऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

आता गेल्या तीन दिवसांपासून समस्तीपूर येथील बाबुलच्या घराबाहेर मृतदेहासोबत मुलीचे नातेवाईक आणि गावकरी बसले आहेत. बाबुलमुळे मुलीला जीव गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. आता बाबुलच येऊन अंतिम संस्कार करणार अशी मागणी देखील केली आहे. मनिषाच्या पतीनेच तिची हत्या केल्याचा संशयही ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

घराबाहेर पोलिसांची फौज तैनात

समस्तीपुर येथील बाबूलच्या घराबाहेर पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बाबूल आणि त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेतला जात आहे. तसेच गावकऱ्यांना देखील समजावले जात आहे की मृतदेह असा जास्त वेळ ठेवणे योग्य नाही.

Follow Us
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार.