AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री 21 वर्षीय युवकाची सात जणांकडून हत्या, सकाळी मुख्य आरोपीचा दगडाने ठेचून खून, नागपूर हादरलं

कौशल्या नगर परिसरात स्वयंदीप नगराळे नावाच्या 21 वर्षीय युवकाचा शुक्रवारी रात्री खून झाला. तर दुसऱ्याच दिवशी (शनिवारी) सकाळी मुख्य आरोपी शक्तिमानची देखील दगडाने ठेचून हत्या करण्यात आली

रात्री 21 वर्षीय युवकाची सात जणांकडून हत्या, सकाळी मुख्य आरोपीचा दगडाने ठेचून खून, नागपूर हादरलं
गँगवॉरच्या घटनेने नागपुरात खळबळ
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 25, 2021 | 7:13 AM
Share

नागपूर : नागपुरातील अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकामागून एक अशी दोन हत्याकांडं झाल्याने गँगवॉर घडल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे एका हत्येचा बदला घेण्यासाठी अवघ्या काही तासात दुसऱ्याची हत्या करण्यात आली. 21 वर्षीय युवकाच्या हत्येनंतर त्या प्रकरणातील मुख्य आरोपीचा मारहाण करत दगडाने ठेचून खून करण्यात आला.

आधी 21 वर्षीय युवकाचा खून

कौशल्या नगर परिसरात स्वयंदीप नगराळे नावाच्या 21 वर्षीय युवकाचा खून झाला. परिसरातील 7 ते 8 युवकांकडून त्याची हत्या करण्यात आली होती. या घटनेत अजनी पोलिसांनी तात्काळ 3 आरोपींना अटक केली, मात्र या खुनातील मुख्य आरोपी शक्तिमान गुरुदेव हा फरार होता.

नंतर मुख्य आरोपीची हत्या

परिसरातील काही युवकांना शक्तिमान हा भांडे प्लॉट चौकाजवळ आपल्या नातेवाईकाच्या घरी लपून असल्याची माहिती मिळाली. त्यासोबतच त्यांनी शक्तिमानला पकडून कौशल्या नगर परिसरात आणले आणि त्याला मारहाण करत त्याची दगडाने ठेचून हत्या केली.

स्वयंदीपचा खून कसा झाला?

21 वर्षीय स्वयंदीप नगराळे हा काल (शुक्रवारी) रात्री जेवण झाल्यानंतर घराबाहेर असलेल्या ऑटोमध्ये बसला होता. त्यावेळी त्याच्यावर 7 युवकांकडून शस्त्रानिशी हल्ला करण्यात आला. त्यात स्वयंदीपचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात आली.

दुसऱ्याच दिवशी (शनिवारी) सकाळी आरोपी शक्तिमानचा देखील दगडाने ठेचून खून झाला. सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी शक्तिमानचा परिसरात दबदबा होता आणि त्याच्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते, तर काही ठिकाणी अवैध जुगार अड्डा या हत्येच्या मागचे खरं कारण असल्याचे बोलले जात आहे.

नागपूर पोलीस आयुक्त घटनास्थळी

एकंदरीतर मागच्या 12 तासात नागपूरमध्ये झालेल्या या थरारक हत्याकांडांमुळे शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आज या घटनेनंतर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला तर नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

संबंधित बातम्या :

नाशकात फ्री स्टाईल हाणामारी, सोसायटी अध्यक्ष-सचिवांनी महिलेला मारहाण केल्याचा आरोप

मयत म्होरक्याच्या जन्मदिवशी ‘रावण’ टोळी शस्त्रांसह जमली, पुण्यात सहा जणांना अटक

(Nagpur 21 years old boy murdered in night main accuse killed on next morning)

Follow Us
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत शिंदेंचा नेता स्पष्टच म्हणाला
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी...काय बदलणार?
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा...
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
Sharad Pawar | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची पंतप्रधान मोदींना थेट विनंती
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं मोठं विधान
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद, व्हिडीओ आले समोर
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन; व्हिडिओ व्हायरल
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
Uddhav Thackeray | आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत