AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवसा मजूरी अन् रात्रीची चोरी, चोरीची ‘हा’ पॅटर्न पाहून पोलिसही चक्रावले, ग्रामीण पोलिसांच्या कारवाईने खळबळ

नाशिकच्या ग्रामीण पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत चोरीचा नवा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात या चोरीच्या घटनेची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

दिवसा मजूरी अन् रात्रीची चोरी, चोरीची 'हा' पॅटर्न पाहून पोलिसही चक्रावले, ग्रामीण पोलिसांच्या कारवाईने खळबळ
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Mar 28, 2023 | 3:52 PM
Share

नाशिक : चोरीसाठी करण्यासाठी चोर नेहमी नवनवीन शक्कल लढवत असतात. मात्र, पोलिसांनी चोरी उघडकीस केली की नवनवीन घटना समोर येतात. अशीच एक चोरीची घटना नाशिकच्या ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणली आहे. खरंतर ही चोरीची घटना उघडकिस आल्यानंतर ग्रामीण भागात खळबळ उडाली असून पोलिस देखील चक्रावून गेले आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांनी केलेली कारवाई चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या सायखेडा पोलिस ठाण्यात एक दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून ही चोरीची घटना समोर आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील सोनगाव येथील सुनील विष्णु दरगुडे यांची दुचाकी चोरीला गेली होती. त्यानंतर काही दिवसांनी सायखेडा येथील जावेद फकीर शाह यांची दुचाकी चोरीला गेली होती.

या दोन्ही तक्रारदारांनी सायखेडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरुण सायखेडा पोलिसांनी दुचाकी चोरीची नोंद करून घेत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सायखेडा पोलिसांनी तपास सुरू केला होता.

तपास करत असतांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने एका संशयिताला ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास करत असतांना थेट अहमदनगर गाठले होते. आणि तिथून दोघांना पकडले होते.

यामध्ये तिघांची चौकशी करत असतांना त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली आहे. यामध्ये विनायक बर्डे, सुखराम मोर आणि अर्जुन मोर असे संशयित आरोपींची नावे असून दोन्ही दुचाकी जप्त केल्या आहे.

यामध्ये दुसऱ्या परिसरात जाऊन संशयित आरोपी हे मजुरीचे काम शोधत असे. कुणी वीट भट्टीवर तर कुणी शेतीचे काम शोधत होते. त्यामुळे काम भेटले की परिसरात पाहणी करून ठेवत होते. त्यानंतर संधी मिळाली की चोरी करून पळून जात असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.