AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यशश्री शिंदे हत्या प्रकरणात मोठं यश, अखेर तो मोबाईल सापडला; मोठा उलगडा होणार?

यशश्री हत्याप्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. राज्याच्या अनेक भागात आंदोलने सुरू आहेत. तर उद्या आरोपी दाऊद शेख याची कोठडी संपत असतानाच पोलिसांना एक मोठं यश आलं आहे. पोलिसांना यशश्रीचा गायब झालेला मोबाईल सापडला असून या मोबाईलमधून अनेक गोष्टींचा उलगडा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

यशश्री शिंदे हत्या प्रकरणात मोठं यश, अखेर तो मोबाईल सापडला; मोठा उलगडा होणार?
| Updated on: Aug 12, 2024 | 2:43 PM
Share

उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. यशश्रीचा गायब झालेला मोबाईल अखेर पोलिसांना सापडला आहे. या मोबाईलमधून यशश्रीच्या हत्येचा उलगडा होणार आहे. दाऊद शेख आणि यशश्रीचं संभाषण तसेच व्हॉट्सअप चॅटवरून या हत्येचा उलगडा होण्यास मदत होणार असून पोलिसांच्या हाती भक्कम पुरावा लागण्याची शक्यताही या निमित्ताने वर्तवली जात आहे.

पोलिसांना यशश्री शिंदे हिचा मोबाईल मिळाला आहे. नवघर पोलीस स्टेशनच्या परिसरातच हा मोबाईल सापडला आहे. हो मोबाईल पाण्यात भिजल्याने तो दुरुस्तीसाठी देण्यात आला आहे. त्यात दाऊद शेख आणि यशश्रीचे संभाषण रेकॉर्ड असल्याचं सांगितलं जात आहे. त्यातून पोलिसांच्या हाती या प्रकरणाची बरीच माहिती मिळणार आहे.

बरेच खुलासे होणार?

यशश्रीच्या या मोबाईलमध्ये काही व्हिडीओ रेकॉर्डिंगही असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पण मोबाईल दुरुस्त झाल्याशिवाय त्यात काय आहे हे पाहणे आवश्यक आहे. या मोबाईलमधील व्हॉट्सअप चॅटची माहितीही पोलिसांना मिळणार आहेत. त्यातूनही बराच उलगडा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. घटनेच्या दिवशी यशश्रीने कुणाकुणाला फोन केला होता, ती कोणत्या कोणत्या परिसरात गेली होती, याची माहितीही पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मोबाईलमधून आणखी काही खुलासे होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

उद्या कोठडी संपणार

दरम्यान, यशश्री हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख याची उद्या 13 ऑगस्ट रोजी पोलीस कोठडी संपत आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आले नव्हते. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात आले होते. उद्या त्याची कोठडी संपत असल्याने त्याची कोठडी वाढते की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज्याती अनेक ठिकाणी पडसाद

यशश्री हत्याकांडाचे राज्यातील अनेक भागात पडसाद उमटले आहेत. विविध संघटनांनी राज्याच्या विविध भागात आंदोलने केली आहेत. नागपूर, नवी मुंबई, अलिबाग, चिपळूणसह अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. चिपळूणमध्ये तर बाजारपेठ बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला होता.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.