AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crime : नेरूळमधील दोन रिअल इस्टेट एजंट्सच्या हत्येचा खुलासा, पोलिसांकडून 5 जणांना अटक

नेरूळमधील दोन रिअल इस्टेट एजंटची हत्या झाली होती. या हत्येचा पोलिसांनी उलगडा केला आहे. दोघेही गायब झाले होते, पोलिसांनी पथके तयार करत या प्रकरणाचा उलगडा केला. नेमकं काय घडलं होतं ते जाणून घ्या.

Crime : नेरूळमधील दोन रिअल इस्टेट एजंट्सच्या हत्येचा खुलासा, पोलिसांकडून 5 जणांना अटक
crime
| Edited By: | Updated on: Aug 29, 2024 | 10:46 PM
Share

नवी मुंबईमधील नेरूळ येथील दोन रिअल इस्टेट एजंट्सच्या हत्येच्या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. हे प्रकरण जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात आर्थिक वादामुळे हत्या केल्याचा खुलासा पोलिसांनी बुधवारी केला. या प्रकरणात विठ्ठल बबन नाकाडे (४३), जयसिंग उर्फ राजा मधु मुदलीयार (३८), आनंद उर्फ एंड्री राजन कुज (३९), विरेंद्र उर्फ गोया भरत कदम (२४) आणि अंकुश उर्फ अंक्या प्रकाश सितापुरे उर्फ सिताफे (३५) या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी करीत आहेत.

क्राइम ब्रांचचे डीसीपी अमित काले यांनी सांगितले की, २१ ऑगस्ट रोजी नेरूळ येथे राहणारे रिअल इस्टेट एजंट अमिर खानजादा आणि सुमित जैन हे प्रॉपर्टी डीलच्या कामासाठी गाडीतून निघाले होते. मात्र, ते घरी परतले नाहीत, त्यामुळे गुरुवारी त्यांच्या गायब झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. या दरम्यान पोलिसांनी गाडीला बसवलेल्या जीपीएसच्या साहाय्याने ती खोपोली येथे अवस्थेत आढळून आली. गाडीत खूनाचे पुरावे आणि दोन रिकाम्या काडतुसे सापडली, त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

तपासासाठी पोलिसांच्या दोन परिमंडळांतील आठ पथके तयार करण्यात आली होती. पथकाने तपास करून पेन पोलीस हद्दीत सुमित जैनचा मृतदेह ताब्यात घेतला. तपासात सुमित जैन याची गोळी मारून हत्या केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी सोमवारी पाचही आरोपींना अटक करून बुधवारी कर्नाळा अभयारण्यातून अमिर खानजादा यांचा मृतदेह जप्त केला. प्राथमिक तपासात सुमित जैन, अमिर खानजादा आणि आरोपी विठ्ठल नाकाडे यांच्यातील जमिनीच्या व्यवहारात आर्थिक वादामुळे ही हत्या झाल्याचे समोर आले आहे

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.