AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्न लागताच नववधूने केलं असं कांड… पतीने डोक्यावरच मारला हात ! लग्नमंडपात काय घडलं ?

बडवानी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली. तिथे लग्नानंतर एक वधूने असं कांड केलं की पती आणि घरच्यांनी डोक्यावरच हात मारून घेतला. नेमकं काय घडलं ?

लग्न लागताच नववधूने केलं असं कांड... पतीने डोक्यावरच मारला हात ! लग्नमंडपात काय घडलं ?
लग्नानंतर नववधूने जे कांड केलं त्याने सगळेच हादरलेImage Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Jul 04, 2025 | 8:36 AM
Share

जेव्हा लग्नाची वरात घेऊन वर त्याच्या भाव वधूच्या दाराशी पोहोचला तेव्हा खूपच आनंदी होता. थोड्याच वेळात आपलं लग्न होणारे या भावनेने त्यांच्या चेहरा आनंदाने फुलला होता. पण लग्न लागताच त्याला असा झटका बसला की डोक्यावर हातच मारून घ्यावा लागला. लग्न लागल्यावर वधूच्या कुटुंबियांनी वराच्या कुटुंबाला सांगितलं की आम्ही काही वस्तू विसरलो आहोत, त्या घेऊन येतो. असं म्हणत ते वधूलाही सोबत घेऊन गेले. बराच वेळ झाला तरी ते परत काही आलेच नाही, वराकडचे लोक त्यांची वाट पहात होते. मात्र पहाट होता होता या प्रकरणात मोठं ट्विस्ट आलं. कारण जिच्याशी नुकतंच लग्न झालं, त्या नववधूने आपल्याला मोठा धोका दिलाय हे वराला आणि त्याच्या कुटुंबियांना समजलं . लग्न लागताच वधू ही लग्न मंडपातूनच सगळे दागिने आणि पैसे घेऊन तिच्या गँगसोबतच फरार झाली. माझी पत्नी पळून गेली असं वराने त्याच्या आईला सांगितलं आणि एकच गदारोळ माजला.

मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील हे प्रकरण आहे. या ठिकाणचे रहिवासी नान सिंग यांचे लग्न होत नव्हते, त्यामुळेच सिंग कुटुंब चिंतेत होते. एके दिवशी नान सिंगचा मोठा भाऊ एका मध्यस्थाला भेटला. मध्यस्थ कैलाश सिंगने सांगितले की नान सिंगसाठी एका मुलीचं स्थळ आलं आहे. आसमा असं तिचं नाव आहे. नान सिंग आणि त्याच्या कुटुंबियांना मुलीचा फोटो दाखवण्यात आला, त्यांना ती मुलगी आवडली. लग्न ठरलं आणि आदिवासी रितीरिवाजांनुसार त्या दोघांचं लग्न लागलं.

साथीदारासोबत नववधू झाली फरार

मात्र लग्न लागल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी नान सिंगच्या कुटुंबीयांना सांगितले की लग्नानंतर ते घरी काही वस्तू विसरले आहेत. यानंतर ती नववधू आणि तिचे साथीदार सोन्याचे दागिने आणि पैसे घेऊन घटनास्थळावरून पळून गेले. दुसऱ्या दिवशी मुलाच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती मिळाली. मनोरंजक गोष्ट म्हणजे, या प्रकरणात, आसमाचा खरा नवरा तिचा मेहुणा बनला. तर या लग्नात इलाम सिंग मुलीचा पिता बनला. या लग्नासाठी हिरालाल नावाच्या माणसाने त्याचे घर उपलब्ध करून दिले होते.

पाच आरोपींना अटक

पण जेव्हा ही फसवणुकीची घटना उघडकीस आली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. नान सिंगच्या कुटुंबाने या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आसमा आणि तिच्या पतीसह पाच जणांना अटक केली.

Follow Us
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर? 
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं नसरापूर अत्याचार प्रकरणी मोठं विधान
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे...
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावरील वाद... शिवतिर्थावर मोठं घडलं?
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चो
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चोरीबाबत राऊतांचं खळबळजनक ट्वीट
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही...
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही... संजय राऊतांनी आज पत्रकार परिषदेत हे काय सांगून टाकलं?