AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इन्स्टाग्रामवर मैत्री, मग प्रेमाच्या आणाभाका, प्रेयसीला भेटायला गेला तो परतलाच नाही !

इन्स्टाग्रामवर प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. मग भेटायचं ठरलं. रात्रीपर्यंत घरी येतो सांगून तरुण इन्स्टावरील प्रेयसीला भेटायला निघून गेला. मात्र त्यानंतर परतलाच नाही.

इन्स्टाग्रामवर मैत्री, मग प्रेमाच्या आणाभाका, प्रेयसीला भेटायला गेला तो परतलाच नाही !
इन्स्टाग्रामवरील प्रेयसीला भेटायला गेला तो परतलाच नाहीImage Credit source: Google
| Updated on: Jul 04, 2023 | 2:35 PM
Share

पटना : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच सोशल मीडियाचं वेड लागलं आहे. सतत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह रहायचं हा रोजच्या दिनचर्येचा भाग बनला आहे. सोशल मीडियावर नाती जोडली जातात आणि फसवणुकाही होतात. अशीच एक धक्कादायक घटना पटनात उघडकीस आली आहे. इन्स्टाग्रामवर गयाच्या तरुणाची पटनामधील तरुणीशी ओळख झाली. दोघांमध्ये आधी मैत्री झाली, मग प्रेमसंबंध जुळले. मग दररोज दोघांमध्ये चॅटिंग सुरु होते. शुक्रवारी दोघांनी भेटण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तरुण गयाहून पटनाला तरुणीला भेटायला आला. मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नाही. सायंकाळी त्याच्या घरच्यांना थेट 50 लाखाच्या खंडणीची मागणी करण्यासाठी फोन आला. त्यानंतर सदर फोनही बंद झाला.

इन्स्टाग्रामवर ओळख, मग प्रेम

गया येथील ऋषभ चौधरी या 15 वर्षीय तरुणाची पटना येथील मुलीशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. मग दोघांचे प्रेमसंबंध जुळले. काही दिवस इन्स्टावर चॅटिंग केल्यानंतर दोघांनी भेटायचे ठरवले. त्यानुसार शुक्रवारी तरुण संध्याकाळपर्यंत परत येतो सांगून गयाहून मुलीला भेटण्यासाठी पटनाला गेला. त्याच्यासोबत त्याचे मित्रही होते. पटनाजवळील संपतचकजवळ पोहचताच त्याचा मोबाईल बंद झाला.

प्रेयसीला भेटायला गेला तो परतलाच नाही

तरुणाच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ संपतचकमध्ये इन्स्टाग्रामवरील प्रेयसीला भेटला. मग दोघे बाईकवरुन कुठेतरी निघून गेले. त्यानंतर तरुणाशी काहीही संपर्क होऊ शकला नाही. यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी ऋषभच्या घरच्यांना एक फोन आला आणि फोनवर 50 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र घरच्यांनी पैसे कुठे द्यायचे विचारताच फोन बंद झाला. त्यानंतर तो फोन सतत बंद येत होता.

यानंतर ऋषभच्या घरच्यांनी बेलागंज पोलीस ठाण्यात धाव घेत सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला असून, मोबाईलचे लोकेशन ट्रेस करत आहेत. प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस प्रकरणाचा वेगाने तपास करत आहेत. तपासाअंती सर्व सत्य उघड होईल.

Follow Us
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा...
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा....
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले...
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले....
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच...
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच....
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका.
थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर...
थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर....
आदिती तटकरे राजीनामा द्या, पुणे अत्याचार प्रकरणानंतर अंधारेंची मागणी
आदिती तटकरे राजीनामा द्या, पुणे अत्याचार प्रकरणानंतर अंधारेंची मागणी.
विजय थलपती यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच? राज्यापलांनी...
विजय थलपती यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच? राज्यापलांनी....
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच.
सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार.....
सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार......
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात...
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात....