AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI, Super 8 : वेस्ट इंडिजविरुद्धच्या करो या मरो सामन्यापूर्वी कर्णधार सूर्यकुमार म्हणाला की…

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. गट 1 मधून दक्षिण अफ्रिका आणि गट 2 मधून इंग्लंडने उपांत्य फेरी गाठली आहे. आता उर्वरित दोन जागांसाठी चुरस आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यापैकी गट 1 मधून एक संघ ठरणार आहे.

IND vs WI, Super 8 : वेस्ट इंडिजविरुद्धच्या करो या मरो सामन्यापूर्वी कर्णधार सूर्यकुमार म्हणाला की...
IND vs WI, Super 8 : वेस्ट इंडिजविरुद्धच्या करो या मरो सामन्यापूर्वी कर्णधार सूर्यकुमार म्हणाला की...Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 26, 2026 | 11:24 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारतान साखळी फेरीच चार पैकी चार सामने जिंकले. पण सुपर 8 फेरीत दक्षिण अफ्रिकेने पराभूत केलं आणि उपांत्य फेरीचं गणित बिघडलं. पण आता सर्व काही पुन्हा एकदा रुळावर आलं आहे. दक्षिण अफ्रिकेने वेस्ट इंडिजला पराभूत केल्याने भारताची वाट सुकर झली होती. त्यानंतर भारताने झिम्बाब्वेला पराभूत करत जर तरचं सर्वच टेन्शन दूर केलं. आता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 1 मार्चला सामना होणार आहे. हा सामना करो या मरोची लढाई आहे. या सामन्यातील विजेत्या संघाला उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. या सामन्यापूर्वी भारताला आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांची बेरीज वजाबाकी करावी लागणार आहे. कारण एकही चूक स्पर्धेती आव्हान संपुष्टात आणू शकते. या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने मनोगत व्यक्त केलं आहे.

कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘आम्ही वेस्ट इंडिज क्रिकेट संघाविरुद्ध खेळायला जातो तेव्हा आम्ही निश्चितच काही अडचणी दूर करू. मला झिम्बाब्वेच्या फलंदाजांकडून कोणतेही श्रेय काढून घ्यायचे नाही. मला वाटतं त्यांनी सुंदर फलंदाजी केली. हो, विकेट चांगली होती, पण त्यांनी डावाकडे ज्या पद्धतीने संपर्क साधला, पॉवरप्लेमध्ये त्यांचा वेळ घेतला आणि नंतर हुशारीने वेग घेतला, तो प्रभावी होता. श्रेय त्यांनाही जाते. गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून, महत्त्वाच्या क्षणी काही पर्यायांसह आम्ही थोडे हुशार असू शकलो असतो. अशा परिस्थितीत, आपल्याला आपले निर्णय धैर्याने घ्यावे लागतील. सकारात्मक मार्ग स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कोलकात्यात पोहोचल्यानंतर, आम्ही बसून त्या सामन्यासाठी योग्य नियोजन करू. सध्या, एक दिवस सुट्टी घेणे, प्रवास करणे आणि आराम करू.’

भारताने साखळी फेरीत अमेरिका, नामिबिया, पाकिस्तान आणि नेदरलँड यांना पराभूत केलं. त्यानंतर सुपर 8 फेरीत भारताचा सामना दक्षिण अफ्रिकेशी झाला. या सामन्यात भारताला 76 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यानंतर भारताचा सामना झिम्बाब्वेशी झाला आणि 72 धावांनी झिम्बाब्वेला पराभूत केलं. या विजयासह भारताने 2 गुणांची कमाई केली आहे. तसेच नेट रनरेट हा -0.100 असा आहे. असं असून भारत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. पण आता या गुणांचा काही एक उपयोग नाही. कारण वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळाला तर उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल.

Follow Us
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन.
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का.
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल.
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी.
भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय
भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय.
संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र
संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र.
नाशिक धर्मांतर प्रकरणातील 7 जण अटकेत,मुख्य सूत्रधार निदा खान कुठे फरार
नाशिक धर्मांतर प्रकरणातील 7 जण अटकेत,मुख्य सूत्रधार निदा खान कुठे फरार.
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल.
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला.
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?.