AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरातून न सांगता पैसे घेऊन महागडा मोबाईल घेतला, वडिलांनी जाब विचारला, घाबरलेल्या उचललं टोकाचं पाऊल

कल्याण पत्री पुलावर काल रात्री एकच गर्दी जमली होती. गर्दी का जमली म्हणून पहायला पोलीस धावले. समोरील दृश्य पाहून सर्वच हैराण झाले.

घरातून न सांगता पैसे घेऊन महागडा मोबाईल घेतला, वडिलांनी जाब विचारला, घाबरलेल्या उचललं टोकाचं पाऊल
कौटुंबिक वादातून पत्नी आणि मुलीची हत्याImage Credit source: socialmedia
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jun 13, 2023 | 1:53 PM
Share

कल्याण : कल्याणमधील पत्री पुलावर आढळलेल्या मृतदेहाबाबत उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे. वडिलांच्या भीतीने 17 वर्षाच्या मुलाने टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. घरातून न सांगता पैसे घेऊन महागडा मोबाईल घेतला म्हणून वडिलांनी जाब विचारला म्हणून स्टेशन परिसरात जीवन संपवल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. मुलगा घरात कोणालाही न सांगता पैसे आणले होते. मोबाईल घेतला त्यामुळे मुलगा घाबरला आणि गावी गेल्यानंतर वडील मला मारतील, या भीतीपोटी त्याने काल रात्रीच्या सुमारास कल्याण स्टेशन पत्री पूल परिसरात जीवन संपवले.

मुलगा मूळचा उत्तर प्रदेशमधील रहिवासी

कल्याणमधील पत्री पूल परिसरात काल रत्रीच्या सुमारास रेल्वे रुळाशेजारी झाडाला लटकलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. पोलिसांनी तपास सुरु करत त्याची ओळख पटवली. तसेच मुलगा आणि त्याचे कुटुंब उत्तर प्रदेश येथील गाजीपूरला राहतात.

पैसे चोरल्याने वडिलांच्या भीतीपोटी जीवन संपवले

मयत मुलगा नुकताच बारावी पास झाला होता. त्याला महागडा मोबाईल घ्यायचा होता म्हणून त्याने गावी कुणालाही न सांगता घरातून एक लाख रुपयांची चोरी केली. हे पैसे घेऊन तो उत्तर प्रदेशहून मीरा भाईंदर येथे आपल्या काकाच्या घरी आला आणि त्यानंतर त्या पैशातून आयफोन घेतला. त्यानंतर हा पुन्हा गावी जायला निघाला. या दरम्यान त्याच्या वडिलांना घरातून पैसे गायब असल्याचे माहित पडले. तेव्हा त्यांनी याबाबत मुलाला विचारणा केली.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...