AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वेचं पाच कोटी रुपयांचं इंजिन गायब झालं, काय आहे नेमकं प्रकरण

दोन महिन्यांपूर्वी एक रेल्वे इंजिन ट्रेलरवर लोड करुन मुंबईकडे रवाना करण्यात आले होते. परंतू ते अद्याप मुंबईत दाखल झालेले नाही.

रेल्वेचं पाच कोटी रुपयांचं इंजिन गायब झालं, काय आहे नेमकं प्रकरण
kalka simlaImage Credit source: socialmedia
| Updated on: Jul 06, 2023 | 12:35 PM
Share

मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईसाठी हरीयाणा येथून निघालेले रेल्वेचे इंजिन दोन महिने झाले तरी त्याच्या अद्याप डीलिव्हरी न झाल्याने मध्य रेल्वेचे अधिकारी चिंतेत सापडले आहे. या प्रकरणात रेल्वेच्या एका ट्रान्सपोर्टरने वडाळा टी.टी. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ज्या इंजिनाची मुंबई डीलिव्हरी होणार होती. त्याची किंमत सुमारे पाच कोटी रुपये असल्याने खळबळ उडाली आहे.

वडाळा टीटी पोलीसांनी दिलेल्या माहीतीनूसार दोन महिन्यांपूर्वी एक रेल्वे इंजिन ट्रेलरवर लोड करुन मुंबईकडे रवाना करण्यात आले होते. परंतू ते अद्याप मुंबईत दाखल झालेले नाही. या नंतर याप्रकरणात रेल्वेच्या वाहतूकदाराने रितसर या प्रकरणाची तक्रार केली आहे. मध्य रेल्वेच्या ट्रान्सपोर्टर अनिल कुमार गुप्ता यांनी पवन शर्मा नावाच्या एका ट्रान्सपोर्टरवर एक रेल्वे इंजिन कालका येथे डीलिव्हरी करण्याची जबाबदारी सोपविली होती. नंतर पवन शर्मा कालकाहून आणखी एक इंजिन मुंबईत पाठविणार होते. या कामासाठी दोघांमध्ये 4, 25,000 रुपयांचे कंत्राट निश्चित झाले, अनिल गुप्ता यांनी यापैकी चार लाख रुपयांचे देणे देखील दिले होते.

पवन शर्मा याच्या कंपनीने २ मे रोजी ट्रेलरवर इंजिन लोड केले, परंतू पैसे मिळण्यास उशीर झाल्याने या इंजिनाची डीलीव्हरी मुंबईच्या पार्सल यार्डमध्ये केली नाही. पवन शर्मा याने पोलिसांना सांगितले की त्याला पैसे वेळेत न मिळाल्याने राजस्थानच्या पेट्रोल पंपावर हा इंजिनाचा ट्रेलर उभा आहे. अनिल गुप्ता यांच्या तक्रारीवरुन आयपीसी कलम 406 आणि 420 नूसार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास वडाळा टीटी पोलीस करीत आहेत.

वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद.
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती.
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष.
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक.
2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! राज ठाकरेंनी दिले आदेश
2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! राज ठाकरेंनी दिले आदेश.
पार्थ पवारांना कोणतीही क्लिनचीट नाही! सूत्रांची माहिती
पार्थ पवारांना कोणतीही क्लिनचीट नाही! सूत्रांची माहिती.
नवी मुबंई महापालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकला
नवी मुबंई महापालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकला.
महापौरपदाच्या निवडणुकीत गडबड होऊ नये म्हणून ठाकरेंचे नगरसेवकांना व्हीप
महापौरपदाच्या निवडणुकीत गडबड होऊ नये म्हणून ठाकरेंचे नगरसेवकांना व्हीप.