AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोमय्यांच्या विरोधात वायकरांचा 100 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा; सोमय्यांना आरोप भोवणार?

शिवसेना नेते आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्यावर जमीन खरेदी प्रकरणी आरोप करणं भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना महागात पडण्याची चिन्हे दिसत आहेत. (ravindra waikar Rs 100-crore defamation case against kirit somaiya)

सोमय्यांच्या विरोधात वायकरांचा 100 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा; सोमय्यांना आरोप भोवणार?
रवींद्र वायकर, शिवसेना नेते
| Updated on: Apr 02, 2021 | 1:09 PM
Share

मुंबई: शिवसेना नेते आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्यावर जमीन खरेदी प्रकरणी आरोप करणं भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना महागात पडण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकरणी वायकर यांनी सोमय्यांविरोधात उच्च न्यायालयात 100 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. (ravindra waikar Rs 100-crore defamation case against kirit somaiya)

स्वत:च्या फायद्यासाठी अलिबाग येथील कोर्लई तसेच महाकाली गुंफा जमीन प्रकरणी सातत्याने बिनबुडाचे आरोप करुन आपली, आपल्या कुटुंबाची तसेच पक्षाची नाहक बदनामी करुन जनमानसातील लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलिन करुन मानसिक त्रास दिल्या प्रकरणी रवींद्र वायकर यांनी किरिट सोमय्यांविरोधात हा दावा केल आहे.

फौजदारी दावाही करणार

नोटीस दिल्यानंतरही सोमय्या यांनी माफी न मागितल्याने अखेर वायकर यांनी सोमय्या यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात रुपये 100 कोटींचा अबुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. एवढेच नव्हे तर लवकरच याप्रकरणी सोमय्यांविरोधात फौजदारी दावाही दाखल करणार असल्याचं वायकर यांनी सांगितलं.

काय होते आरोप?

सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन वायकरांविरोधात गंभीर आरोप केले आहेत. अलिबाग कोर्लई येथील संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडून संयुक्तरित्या खरेदी केलेल्या जमिनीवर 19 बंगले असल्याचा आणि वरील माहिती निवडणुक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात लपविण्यात आल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. यावेळी या जमिनीवरील बंगल्याचा वापर व्यवसायासाठी केल्याचा तसेच या दोघांमधील आर्थिक हितसंबंध काय आहे, असा आरोपही त्यांनी होता. या खरेदी व्यवहारात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि वायकरांच्या पत्नीचे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

महाकाली गुंफेबाबतचे आरोप

कोर्लई येथील प्रकरणानंतर सोमय्या यांनी महाकाली गुंफेप्रकरणीही वायकरांवर आरोप केले होते. महाकाली गुंफा जमीनप्रकरणी वायकर यांना अविनाश भोसले व शाहीद बलवांकडून 25 कोटी रुपयांचा मोबदला मिळाल्याचा आरोपर त्यांनी केला होता. हे आरोप करतानाही त्यांनी कुठलेही सबळ पुरावे सादर केले नाहीत. सोमय्या हे सातत्याने स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी लोकप्रतिनिधीची आपली जनमानसातील प्रतिमा, आपल्या कुटुंबाची तसेच पक्षाची प्रतिमा मलिन करुन मानसिक त्रास देत असल्याने, वायकर यांनी सोमय्या यांना या दोन्ही प्रकरणी जाहीर माफी न मागितल्यास सिव्हिल व क्रिमिनल कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सोमय्या यांना नोटीसीद्वारे दिला होता. एवढेच नव्हे या दोन्ही प्रकरणी वायकर यांनी मुंबई पोलिस आयुक्त तसेच एम.आय.डी.सी पोलिस ठाण्यास पत्र देऊन बेताल व बिनबुडाचे वक्तव्य करुन जनमानसातिल लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलिन करणार्‍या सोमय्या यांना लगाम घालण्याची तसेच त्यांच्यावर उचित ती कारवाई करण्याची विनंतीही केली होती. (ravindra waikar Rs 100-crore defamation case against kirit somaiya)

संबंधित बातम्या:

ठाकरे कुटुंबीयांसोबत जमीन खरेदीत भागिदारी?; कोण आहेत रवींद्र वायकर वाचा सविस्तर!

रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार!, किरिट सोमय्या यांचा दावा, अर्णव गोस्वामी प्रकरणात मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

किरीट सोमय्या पाणचट माणूस, कुणीही भागीदारी करु शकतो, कुठलीही चौकशी करा : रवींद्र वायकर

(ravindra waikar Rs 100-crore defamation case against kirit somaiya)

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.