AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Vaze : न्यायालयाच्या दणक्यानंतर सचिन वाझेची याचिका मागे, नेमकं प्रकरण काय?

काल सुनावणी दरम्यान बिनशर्त याचिका वापस घ्या. अन्यथा कठोरपणे ती आम्ही फेटाळून लावू अशा शब्दात न्यायालयाने सचिन वाझेला फटकारले होते. काल न्यायालयाच्या फटकारानंतर आज सचिन वाझे याच्याकडून मुंबई हायकोर्टातून ही याचिका मागे घेण्यात आली आहे.

Sachin Vaze : न्यायालयाच्या दणक्यानंतर सचिन वाझेची याचिका मागे, नेमकं प्रकरण काय?
सचिन वाझेला कोर्टाचा दणकाImage Credit source: mumbaimirror
| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Mar 02, 2022 | 7:33 PM
Share

मुंबई : चांदिवाल आयोगाच्या (Chandiwal Commission) विरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दाखल केलेली याचिका सचिन वाझेने (Sachin Vaze) आज बिनशर्त मागे घेतली आहे. ह्या संदर्भात सचिन वाझे याच्या याचिकेमध्ये जोडण्यात आलेल्या चार प्रतिज्ञापत्रं जोडली होती. यात देण्यात आलेली माहिती चुकीची असून एका प्रकारे न्यायालयाचा फसवणूक आहे असे न्यायालयाने म्हटल्यानंतर काल सुनावणी दरम्यान बिनशर्त याचिका वापस घ्या. अन्यथा कठोरपणे ती आम्ही फेटाळून लावू अशा शब्दात न्यायालयाने सचिन वाझेला फटकारले होते. काल न्यायालयाच्या फटकारानंतर आज सचिन वाझे याच्याकडून मुंबई हायकोर्टातून ही याचिका मागे घेण्यात आली आहे. चांदीवाल आयोगाला दिलेले आपले चार अर्ज फेटाळल्याच्या निर्णया विरोधात वाझेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सदर याचिकेत योग्य माहिती लपवत असल्याबद्दल खंडपीठानं वाझेच्या वकिलांना फटकारले. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने सदर याचिके मध्ये योग्य माहिती लपवल्याबद्दल ताशेरे ओढले आहेत.

नेमका प्रकार काय घडला?

एकंदरीत माहितीप्रमाणे चांदीवाल आयोगाने 24 जानेवारी व 9 फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशांच्या वैधतेला वाझे याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते . 21 जानेवारी रोजी वाझे याने मुंबई पोलिसांचे सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारांबे यांना आयोगापुढे साक्ष देण्यासाठी समन्स बजवावे. असा अर्ज आयोगासमोर केला होता. मिलिंद भारांबे यांनी एक पत्र लिहीले होते आणि 25 मार्च 2021 रोजी त्यासंबंधी अहवाल तयार केला होता. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भारांबे यांच्या पत्रासह गुप्त पत्राची प्रत 30 मार्च 2021 रोजी आयोगा समोर सादर केली.

भारंबेंना साक्षसाठी बोलवण्याची मागणी

सह पोलीस आयुक्त भारांबे यांचा अहवाल आपल्या हिताआड येत असल्याचे म्हणत वाझे याने भारांबे यांना आयोगापुढे साक्ष देण्याकरिता बोलाविण्याची विनंती आयोगाला लेखी अर्जाद्वारे केली होती . मात्र आयोगाने 24 जानेवारीला वाजेचा सदर अर्ज फेटाळला होता. तसेच 9 फेब्रुवारी रोजी वाझेने अनिल देशमुख यांच्या संदर्भात दिलेला जबाब मागे घेण्यासाठी अर्ज केला. वाझे याने सुरुवातील आयोगाला सांगितले की देशमुख किंवा त्यांच्यावतीने अन्य कोणीही त्याला मुंबईतील बार मालकांकडून 100 कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले नव्हते. परंतू एका महिन्यातच त्याने तो जबाब मागे घेण्यास अर्ज केला. आयोगाने त्यावरही नकार दिला. त्यामुळे वाझे याने चांदीवाल आयोगाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती . मात्र आज ती याचिका सचिन वाजे तर्फे बिनशर्त मागे घेण्यात आली आहे .

Murder | बापलेकाची हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी एकाचा मृतदेह पुरला, तर दुसऱ्या मृतदेहासोबत…

अर्जुन खोतकरांच्या अडचणीत वाढ! रामनगर साखर कारखान्यावर निर्बंध लावण्याचे आदेश

लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच संसारात विष, नवऱ्यासह कुटुंबातील सर्वांना विष पाजून मुद्देमाल घेऊन नवरी फरार

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली