AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भयानक ! कुत्र्यावरून सुरू झालेल्या वादाला हिंसक वळण, गार्डने केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू

भांडण वाढल्यानतर आरोपी गार्ड हा अचानक घरातील बंदूक घेऊन वर गेला आणि त्याने गोळीबार केला. यामध्ये दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाले आहेत.

भयानक ! कुत्र्यावरून सुरू झालेल्या वादाला हिंसक वळण, गार्डने केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू
| Updated on: Aug 18, 2023 | 1:07 PM
Share

इंदोर| 18 ऑगस्ट 2023 : एका विचित्र आणि दुःखद घटनेत, दोन कुत्र्यांमधील भांडण त्यांच्या मालकांच्या भांडणासाठी (dispute over dog) कारणीभूत ठरले. अन् त्याचा अतिशय हिंसक व दु:खद शेवट झाला. या संघर्षात दोघांचा मृत्यू झाला (2 died) असून सहा जण जखमी झाले आहेत. कुत्र्यांवरून सुरू झालेल्या वादानंतर एकाच्या मालकाने घराच्या छतावरून केलेल्या गोळीबारात निष्पापण लोकांना जीव गमवावा लागला तर काही जण गंभीर जखमी झाले. मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजपाल असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव असून तो बँक ऑफ बडोदा येथे गार्ड म्हणून कार्यरत आहे. त्याने त्याच्या सर्व्हिस गनचा वापर करून गोळ्या झाडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी गार्डला अटक केली असून त्याच्याकडून गोळीबारासाठी वापरलेले शस्त्रही जप्त करण्यात आले आहे.

नक्की काय घडलं ?

पोलिसांच्या सांगण्यानुसार, दोन शेजाऱ्यांनी त्यांच्या कुत्र्यांना बाहेर फिरायला नेल्यानंतर थोड्याच वेळात हा प्रकार घडला. प्रथम हे दोन्ही श्वान एकमेकांवर भुंकू लागले व त्यांच्यात भांडण झाले व नंतर मालकांणमध्ये वाद झाला. मात्र तेव्हा शेजारी-पाजारी असणाऱ्या इतर लोकांनी मध्यस्थी करत भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तरीही थोड्यावेळाने वाद पुन्हा पेटला आणि एका कुत्र्याचा मालक असलेल्या राजपाल यांनी घरात जाऊन बंदूक घेतली आणि वरच्या मजल्यावर जाऊन गोळ्या झाडल्या.

आरोपी राजपाल यांनी प्रथम हवेत दोन गोल्या झाडल्या आणि नंतर त्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. .12 बोरच्या डबल बॅरेल बंदूकीतून त्यांनी गोळीबार केला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून इतर सहा जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपी राजपाल आणि मृत नागरिक यांच्यात आधीपासून काही वाद नव्हता असे पोलिसांनी स्पष्ट केले. हा वाद अचानक सुरू झाला व नंतर त्याचे तीव्र संघर्षात रुपांतर झाले असे पोलिसांनी सांगितले.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.