AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खिडकीतून पाहिलं अन् पायाखालची वाळूच सरकली, घराचं स्मशान कसं झालं? असं काय घडलं ‘त्या’ घरात?

शेजाऱ्यांनी खिडकीतून डोकावून पाहिलं अन् त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या घरात असं काय घडलं होतं? काय झालं होतं त्या घरात? लोक का घाबरून गेले होते? घराचा दरवाजा का उघडला जात नव्हता?

खिडकीतून पाहिलं अन् पायाखालची वाळूच सरकली, घराचं स्मशान कसं झालं? असं काय घडलं 'त्या' घरात?
Ujjain NewsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 21, 2023 | 7:36 PM
Share

उज्जैन | 21 सप्टेंबर 2023 : आयुष्य हे क्षणभंगूर आहे. याचा प्रत्यय वारंवार येत असतो. तुम्ही जे ठरवता, जे प्लॅनिंग करता उद्या तसं घडेलच याची शाश्वती नसते. एवढेच कशाला उद्या उगवेल याची काही हमीही नसते. सर्व प्लॅनिंग फोल होतात. असं काही आयुष्यात घडतं की होत्याचं नव्हतं होतं. एक वादळ येतं आणि सर्व पालापाचोळा वाहून जातो. एका हसत्या खेळत्या घरातही तेच घडलं. कालपर्यंत सर्वकाही आनंदी आनंद होता. पण आज त्या घराचं स्मशान झालंय. काय झालं त्या घरात? एका दिवसात असं काय बदललं?

मध्य प्रदेशातली उज्जैनमध्ये गुरुवारी सकाळी सर्वांनाच हादरवून टाकणारी घटना घडली आहे. येथील एका संपूर्ण कुटुंबानेच जीवन संपवलं आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या कुटुंबाला भेटण्यासाठी एक तरुण आला होता. जेव्हा कोणीच दरवाजा उघडत नसल्याचं लक्षात आलं तेव्हा काही तरी घडल्याचा त्याला संशय आला. त्यानंतर त्याने शेजाऱ्यांना त्याची माहिती दिली. शेजाऱ्यांनी खिडकीतून आतील दृश्य पाहिलं तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. घरात चार मृतदेह पडलेले होते.

आतून आवाजच आला नाही

उज्जैनमधील जिवाजीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जानकीनगरमध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीन महिन्यापूर्वीच मनोज त्याची पत्नी ममता, मुलगा लक्की आणि मुलगी कनक सोबत या ठिकाणी राहायला आले होते. मनोज हा गढकालिका मंदिर आणि आसपासच्या परिसरात फूल आणि खेळण्याची दुकान लावत होता. आज सकाळी सर्व लोक नेहमीप्रमाणे कामाला लागले होते. मनोजला भेटायला त्याचा एक मित्र गोलू त्याला भेटायला आला होता.

त्याने बराच वेळ मनोजच्या घराचा दरवाजा ठोठावला. पण आतून काहीच आवाज आला नाही. घर तर आतून बंद होतं. कुणीच बोलत नव्हतं. त्यामुळे त्याला संशय आला. मनात पाल चुकचुकली. काही अनर्थ तर घडला नाही ना? अशी मनात शंका आली आणि त्याने शेजाऱ्यांना बोलावून दरवाजा उघडत नसल्याचं सांगितलं.

खिडकीतून पाहिलं अन्

या घराचा मालक आसाराम आणि शेजारी राहणारे लोक आले. त्यांनीही बराच वेळ दरवाजा ठोठावला. पण काहीच आवाज आला नाही. त्यानंतर या लोकांनी खिडकीतून डोकावून पाहिलं. समोर जे दिसलं त्याने त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. मनोज घरात पंख्याला लटकलेला होता. तर त्याची पत्नी ममता, मुलगा लक्की आणि मुलगी कनक यांचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता.

त्यांच्या तोंडातून फेस आलेला होता. या घटनेची तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या घटनेचा तात्काळ पंचनामा केला. मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.

कर्जामुळे जीवन संपवलं

पोलिसांनी मनोजच्या घराचा कोपरा न् कोपरा तपासला. पोलिसांना घरात काहीच संशयास्पद वस्तू मिळाली नाही. सुसाईड नोटही मिळाली नाही. मनोजवर प्रचंड कर्ज होतं. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून तो त्रस्त होता. शेजारील लोकांनी त्याच्या कर्जाची माहिती पोलिसांना दिली. आता पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

दुसरं लग्न केलं होतं

पोलिसांनी अधिक तपास केला असता मनोजने काही वर्षापूर्वी ममताशी प्रेमविवाह केल्याचं उघड झालं. यापूर्वी ममताचा विवाह झालेला होता. लक्की आणि कनक ही दोन्ही मुलं ममताला पहिल्या पतीपासून झालेली आहेत. त्यामुळे आता पोलीस विविध अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.