AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेग कंट्रोलच्या बाहेर, ट्रक समोरसोरच भिडले! ट्रकसह दोन्ही चालकांच्या शरीराचाही चेंदामेंदा

हा अपघात इतका भयंकर होता की अपघातामध्ये दोन्ही ट्रकचा अक्षरशः चक्काचूर झाला होता.

वेग कंट्रोलच्या बाहेर, ट्रक समोरसोरच भिडले! ट्रकसह दोन्ही चालकांच्या शरीराचाही चेंदामेंदा
भीषण अपघात..Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Oct 06, 2022 | 12:28 PM
Share

मनोज गाडेकर, TV9 मराठी, अहमदनगर : अहमदनगरच्या (Ahmednagar) राहता तालुक्यात ट्रकचा भीषण अपघात (Truck Accident) झाला. दोन ट्रक एकमेकांना समोरासमोरच भिडले आणि अपघात घडला. हा अपघात इतका भीषण (Shirdi Accident News) होता की दोन्ही ट्रकचा तर चेंदामेंदा झालाच. पण ट्रकमध्ये असलेल्या चालकांनाही जबर मार बसून त्यांच्यावरही काळानं घाला घातला. या अपघातामुळे बेदरकारपणे ट्रक चालवणाऱ्या चालकांना शिस्त कधी लागणार, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय.

राहता तालुक्यातील लोणी-कोल्हार मार्गावर दोन मालवाहू ट्रकची जबरदस्त धडक झाली. समोरासमोर धडक झाल्यामुळे या दोन्ही ट्रकच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. अपघाताची तीव्रता इतकी जबर होती की दोन्ही मालवाहू ट्रकच्या चालकांचाही जागच्या जागी मृत्यू झाला. संतोष राख आणि सुनील जायभाये अशी मृत्यू झालेल्या चालकांची नावं आहेत.

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मालवाहू ट्रकच्या अपघातामुळे लोणी-कोल्हार मार्गावर काही प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती. अखेर अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्या साहाय्याने बाजूला हटवण्यात आले. त्यानंतर या मार्गावर विस्कळीत झालेली वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आणण्यात आली.

मालवाहू ट्रकच्या अपघातामुळे अवजड वाहनं बेदरकारपणे चालवणाऱ्या चालकांना शिस्त लावण्याची गरज आता निर्माण झाली आहे. तसंच राज्यातील अपघातांची मालिका सुरूच असल्याचंही यानिमित्ताने पुन्हा पाहायला मिळतंय. या अपघाताची पोलिसांनी नोंद करुन घेतली असून पुढील तपास केला जातो आहे.

विनायक मेटे, सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्यातील रस्ते अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतरही महाराष्ट्रात रस्ते अपघातांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच असल्यानं चिंता व्यक्त केली जातेय. बेशिस्तपणे वाहनं चालवणं, लेन तोडणं, ओव्हरटेकिंगचा नाद, वेगाची मर्यादा न पाळणं, ही अपघात वाढण्याची प्रमुख कारणं असल्याचंही अभ्यासातून समोर आलं होतं.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.