AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थाटामाटात लग्न पार पडलं, घरात उत्साहाचं वातावरण होतं, नवदाम्पत्य बेडरुममध्ये गेलं अन् घरावर शोककळाच पसरली !

त्या दोघांचं विधीवत लग्न पार पडलं. नववधूसह वरात नवऱ्याच्या घरी आली. लग्नानंतरचे सर्व विधी पार पडल्यानंतर नवविवाहित जोडपे हनिमूनसाठी बेडरुममध्ये गेले. मात्र सकाळ होताच घरात एकच गोंधळ माजला.

थाटामाटात लग्न पार पडलं, घरात उत्साहाचं वातावरण होतं, नवदाम्पत्य बेडरुममध्ये गेलं अन् घरावर शोककळाच पसरली !
हनिमूनच्या रात्रीच नवविवाहित जोडप्याचा संशयास्पद मृत्यूImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Jun 01, 2023 | 4:18 PM
Share

बहराइच : उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरात मुलाचे लग्न होते. लग्न अगदी थाटामाटात पार पडले. मोठ्या जल्लोषात नव्या सुनेचे स्वागत करण्यात आले. लग्नानंतरचे सर्व रीतीरिवाज पार पडल्यानंतर नवविवाहित जोडपे हनिमूनसाठी बेडरुममध्ये गेले. सकाळ होताच घरावर शोककळा पसरली. हनिमूनच्या रात्रीच नवविवाहित जोडप्याचा संशयास्पद मृत्यू झाला. ज्या आनंद साजरा होत होता, त्या घरावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. मुलगा आणि सुनेचा मृतदेह पाहून घरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे संपूर्ण गावात हाहाकार माजला. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. आता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच नवविवाहित जोडप्याच्या मृत्यूचे कारण समजेल.

बहराइचमधील कैसरगंजच्या गोदहिया क्रमांक चारमध्ये राहणाऱ्या प्रतापचा विवाह मंगळवारी 30 मे रोजी गोधिया क्रमांक दोनच्या गुल्लानपुरवा गावात राहणाऱ्या पुष्पा यादवसोबत झाला होता. मोठ्या थाटामाटात लग्नाची मिरवणूक वधूच्या दारात पोहोचली. सर्व विधी पार पाडत उत्साहात लग्नसोहळा संपन्न झाला. त्यानंतर बुधवारी नववधूला घेऊन वरात नवरदेवाकडे आली. घरात नव्या सुनेच्या स्वागताची पूर्ण तयारी करण्यात आली होती.

सकाळी जोडपं उठलं नाही म्हणून घरचे पहायला गेले तर…

रात्री नवविवाहित जोडपे झोपण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले. मात्र सकाळी बराच उशीर होऊनही दोघे बाहेर आले नाहीत. आधी कुटुंबीयांनी फारसे लक्ष दिले नाही. लग्नसोहळ्यामुळे खूप दमल्याने दोघे उशीरपर्यंत झोपले असावे, असा कुटुंबीयांचा समज झाला. मात्र बराच वेळ होऊनही दरवाजा न उघडल्याने कुटुंबीयांनी त्यांच्या खोलीचे दार ठोठावले. मात्र आतून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे घरातील सदस्य काळजीत पडले. त्यानंतर खिडकीतून डोकावले असता पुष्पा आणि प्रताप बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडले होते.

त्यानंतर कुटुंबीयांनी दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला असता, दोघेही मृतावस्थेत पडलेले दिसले. यानंतर लग्नघरात एकच गोंधळ उडाला. वधूकडच्या लोकांना प्रकरणाची माहिती देण्यात आली. तपास आणि शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

Follow Us
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी