AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breaking : तब्बल 205.6 किलो हेरॉईनसह 394 मेट्रिक टन जिप्सम पावडरही जप्त! गुजरातमध्ये पुन्हा मोठा अंमलीसाठा हस्तगत

इराणहून आलेल्या कांडला बंदरात तब्बल 205.6 किलो हेरॉईन जप्त असल्याचं समोर आलंय.

Breaking : तब्बल 205.6 किलो हेरॉईनसह 394 मेट्रिक टन जिप्सम पावडरही जप्त! गुजरातमध्ये पुन्हा मोठा अंमलीसाठा हस्तगत
कांडला बंदर, गुजरातImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Apr 25, 2022 | 11:37 AM
Share

नवी दिल्ली : गुजरातमध्ये एका बंदरावर (Kandla Port, Gujrat) पुन्हा एकदा अतिप्रचंड प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली. गुजरात कांडला बंदरावर अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. तब्बल 350 किलो हेरॉईन (Heroin) जप्त करण्यात आलं आहे. कांडला बंदाराच्या गोदामात गुजरात एटीएस (Gujrat ATS) आणि डीआरआयनं केलेल्या कारवाईत अंमली पदार्थांच्या मोठ्या साठ्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. जवळपसा दोन हजार कोटी रुपयांचा हा साठा असल्याचा संशयही व्यक्त केला जातोय. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार केंद्रीय अर्थमंत्रालयानं या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या साठ्याची आकडेवारीही जारी केली आहे. बुधवारी (20 एप्रिल) तर गुरुवारी (21 एप्रिल) रोजी मोठी कारवाई कांजला बंदरावर करण्यात आली होती.

या कारवाईदरम्यान, 17 कंटेनरमधून 10 हजार 318 जिप्समच्या गोण्या आणण्यात आल्या होत्या. त्यातून 3 लाख 94 हजार 400 किलो वजनाचा अंमली साठा जप्त करण्यात आलाय. या अंमली पदार्थाची वाहतूक उत्तराखंडच्या पांडरी सिसोनामधील बालाजी ट्रेडर्स कंपनीनं या मालाची वाहतूक इराणहून भारतात केली होती, अशी माहिती अमर उजालानं दिली आहे. इराणच्या अब्बास बंदरातून हा अंमली पदार्थांचा साठा आणण्यात आला होता.

काय काय आढळलं?

इराणहून कांडला बंदरात आलेल्या 17 कंटेनरमध्ये खळबळजनक बाबी आढळून आल्या आहेत. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं याबाबतची धक्कादायक माहिती दिली आहे. इराणहून आलेल्या कांडला बंदरात तब्बल 205.6 किलो हेरॉईन जप्त असल्याचं समोर आलंय. याची किंमत अवैध बाजारात जवळपास 1 हजार 439 कोटी इतकं असल्याचं सांगितलं जातंय. तर 394 मेट्रीक टन जिम्पस पावडर आढळून आलीय.

ANI चं दिलेल्या ट्वीटमध्ये काय?

सहा महिन्यांपासून बेवारस पडून

खरंतर ज्या अंमलीसाठ्यावर कारवाई करण्यात आली, तो साठा गेल्या सहा महिन्यांपासून बंदरावर पडून होता. बेवारस माल असल्याचं समजून हा साठा पडून असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये या गोण्या कांडला बंदरावर उतरवण्यात आल्या होत्या. गुजरात एटीएसला याबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी शोध मोहीम राबवून या साठ्यावर कारवाई केली आहे. दरम्यान, दिल्ली आणि पंजाबमध्ये या गोण्यातील साठा पोहोचवण्याचा कट रचला गेला होता, अशीही माहिती समोर आली आहे.

13 सप्टेंबर 2021ला 21 हजार कोटीचे ड्रग्स

दरम्यान, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात गुजरातच्या मुंदरा बंदरात तब्बल एकवीस हजार कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आलं होतं. हे प्रकरण बराचवेळ चर्चतही राहिलं होतं. टेल्कम पावडर नावानं हे ड्रग्स भारतात आणण्यात आलं होतं. तर आता जिप्सम पावडर नावानं पुन्हा भारतात आणलेल्या ड्रग्सवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.