बंगालमधून फसवून आणून चिपळूणमध्ये वेश्या व्यवसाय, दोन मुलींची थरारक सुटका

पश्चिम बंगालमधून 2 मुलींना फसवून आणून वेश्या व्यवसायाच्या खाईत फेकल्याची घटना खेर्डी येथे घडली. (girls prostitution business rescue)

बंगालमधून फसवून आणून चिपळूणमध्ये वेश्या व्यवसाय, दोन मुलींची थरारक सुटका
Follow us
| Updated on: Nov 28, 2020 | 5:01 PM

रत्नागिरी : पश्चिम बंगालमधून 2 मुलींना फसवून आणून वेश्या व्यवसायाच्या (prostitution) खाईत फेकल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथे घडली. नोकरी लावून देतो असं सागत या मुलींना महाराष्ट्रात आणल्याचं सांगण्यात येत आहे. मागील दोन महिन्यांपासून या मुलींवर अत्याचार करण्यात येत होते. हा प्रकार समजताच हेल्प फाऊंडेशन आणि पोलिसांच्या मदतीने थरारकपणे या मुलींची सुटका करण्यात आली. (Two girls have been rescued from prostitution business in Ratnagiri)

या दोन्ही मुलींची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांच्यावर अत्याचार झाल्याचे सिद्ध झालं आहे. याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील मुलींना नोकरीचे आमिष दाखवत जिल्ह्यातील चिपळूमधील खेर्डी येथे आणण्यात आले. यातील एक मुलगी ही अल्पवयीन आहे. खेर्डी शहरात आणल्यानंतर त्यांना धमक्या देत तसेच मारहाण करत त्यांना त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आले. मागील दोन महिन्यांपासून त्याच्यावर हा अत्याचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेल्प फाऊंडेशनला समजताच आरोपी गर्भगळीत

मुलींवरील अत्याचाराचा सुगावा हेल्प फाऊंडेशन या सामाजिक संस्थेला लागला. संस्थेचे अध्यक्ष सतीश कदम यांनी या मुलींची तातडीने भेट घेतली. यावेळी संस्थेचे सदस्य श्रीधर भुरणही उपस्थित होते. सतीश कदम यांनी मुलींची भेट घेतल्याचे संशयिताला समजले. मुलींना जबरदस्तीने वेश्याव्यसाय करायला लावण्याचा हा प्रकार बाहेर समजल्याचे कळताच आरोपी गर्भगळीत झाला. त्यांनतर संशयिताने मुलींना पुन्हा त्रास देणे सुरु केले. त्यांना मारहाण केली. तसेच, त्यांचा मोबाईल फोनदेखील हिसकावून घेतला. तो खर्डी येथून फरार होण्याच्या बेतात होता. तर दुसरीकडे हेल्प फाऊंडेशन आणि पोलिसांना संशयिताला पकडण्याची तयारी सुरु केली. (Two girls have been rescued from prostitution business in Ratnagiri)

मुलींच्या सुटकेचा थरार

सतीश कदम यांनी घडलेल्या प्रकाराची पोलीस निरिक्षक देवेंद्र पोळ यांना कल्पना दिली. पोलिसांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेतली. त्यांनी हेल्प फाऊंडेशनच्या मादतीने संशयिताला पकडण्यासाठी सापळा रचला. या ऑपरेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण, पो.कॉन्स्टेबल आरती चव्हाण, पंकज पाडाळकर, आणि आशिष भालेकर ही टीम साध्या वेषात खेर्डीकडे रवाना झाली. हेल्प फाऊंडेशनचे पदाधिकारीदेखील त्यांच्यासोबत होते.

दरम्यान, संशयित ओरोपी पळून जाण्याच्या बेतात असताना त्यालाच आधी पडण्याचे ठरले. त्यानंतर रेस्क्यू पथकाने संशयिताला बेसावध असताना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संशयिताला पकडल्यानंतर पोलिसांनी मुलींचीदेखील सुटका केली आहे. हेल्प फाऊंडेशन आणि पोलिसांच्या या रेस्क्यू ऑपरेशनमुळे मुलींची सुटका होऊ कली. मात्र, आरोपीला अकट केल्यानंतर प्रथमिक तपासातून या रॅकेटची व्यापकता अजूनही मोठी असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Two girls have been rescued from prostitution business in Ratnagiri)

संबंधित बातम्या :

घरात झोपलेली असताना 90 वर्षीय वृद्धेवर अतिप्रसंग, नराधमाला अटक

आई-वडील मुंबईत, अभ्यासासाठी एकटाच गावी, MPSC परीक्षा पुढे गेल्याने तरुणाची आत्महत्या

कल्याणजवळ थरार, विनयभंगानंतर तरुणीला धावत्या लोकलमधून फेकण्याचा प्रयत्न, तरुणीचा जिगरबाज लढा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.