AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरा-बायकोचं कडाक्याचं भांडण, आईने मुलांना पाण्यात फेकून दिलं, लहानग्यांचा बुडून मृत्यू

पत्नी आणि मुले खदानीत पडल्याचे पाहताच अतुल सुर्यवंशी यांनीही खदानीत उडी टाकली. | Husband Wife

नवरा-बायकोचं कडाक्याचं भांडण, आईने मुलांना पाण्यात फेकून दिलं, लहानग्यांचा बुडून मृत्यू
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: May 29, 2021 | 12:05 PM
Share

बारामती: बारामतीमध्ये पती-पत्नीच्या वादात दोन लहानग्यांचा नाहक बळी गेल्याची घटना समोर आली आहे. पती आणि पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि याच रागातून पत्नीने मुलांना पाण्याने भरलेल्या खदानीत फेकून दिले.  यामध्ये दोन्ही मुलांचा बुडून मृत्यू झाला. (Kids died due to husband and wife dispute)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बारामातीच्या पिंपळी गावात घडली. अंजली सुर्यवंशी आणि अतुल सुर्यवंशी या दाम्पत्यामध्ये गुरुवारी रात्री कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे अंजली सुर्यवंशी यांच्या संतापाचा पारा चढला. याच रागाच्या भरात अंजली सुर्यवंशी यांनी आपल्या पोटच्या मुलांना जवळच्या एका खदानीत फेकून दिले. त्यानंतर स्वत:ही खदानीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

पत्नी आणि मुले खदानीत पडल्याचे पाहताच अतुल सुर्यवंशी यांनीही खदानीत उडी टाकली. त्यांनी आपल्या पत्नीला खदानीच्या बाहेर काढले. मात्र, आपल्या दिव्या आणि शौर्य या दोन लहान मुलांचा जीव वाचवण्यात ते अपयशी ठरले.

पत्नीसोबतचा वाद विकोपाला, आधी दीड वर्षाच्या चिमुकल्याला गळफास, नंतर बापाची आत्महत्या

पत्नीशी झालेल्या वादातून पतीने दीड वर्षीय मुलासह गळफास घेऊन आत्महत्या केल्या धक्कादायक घटना समोर आली आहे. दिनेश पुंडलिक वानखडे (26)असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बुलडाण्यातील संग्रामपूर तालुक्यात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

बुलडाण्यातील संग्रामपूर तालुक्यात कुंदेगाव आहे. या ठिकाणी दिनेश पुंडलिक वानखडे हे राहतात. दिनेश वानख़डे यांचे काल पत्नीशी जोरदार भांडण झाले. यानंतर दिनेश हा दीड वर्षाच्या चिमुकला रोशनला घेऊन कुंदेगाव शिवारातील एका लिंबाच्या झाडाजवळ आला. त्यानंतर त्याने एका ओढणीच्या मदतीने रोशनला गळफास दिला. त्यानंतर स्वत: दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केली. पती-पत्नीच्या वादातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO: गंभीर गुन्ह्यातील महिला आरोपी पळण्याच्या प्रयत्नात रेल्वे ट्रॅकवर पडली, पोलीस अधिकाऱ्याने वाचवला जीव

सोलापुरात राडा, दारूच्या अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला, पोलीस निरीक्षक गंभीर जखमी

तीन महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज, पत्नीने शिवी दिल्याचा राग आला, पतीने गळा दाबून खेळच संपवला

(Kids died due to husband and wife dispute)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली