AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहरुख खान याच्या मन्नतची दोघा युवकांनी भिंत तोडली; कारण विचारले असता त्यांनी सांगितले…

वांद्रे पोलिसांनी देत असताना त्यांनी सांगितले की, 19 ते 20 वर्षे वयोगटातील दोन तरुणांना ड्युटीवर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बंगल्यात प्रवेश करताना ताब्यात घेतले आहे.

शाहरुख खान याच्या मन्नतची दोघा युवकांनी भिंत तोडली; कारण विचारले असता त्यांनी सांगितले...
| Updated on: Mar 03, 2023 | 12:40 AM
Share

मुंबई : भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्याची भिंत फोडून प्रवेश करणाऱ्या दोन युवकांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याची भिंत फोडून प्रवेश केल्याने या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र पोलिसांनी या प्रकरणी दोन युवकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. भिंत तोडल्याप्रकरणी दोन युवकांवर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास वांद्रे पोलीस करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुंबई पोलिसांनी गुरुवारी दोघांना शाहरुख खानच्या बंगल्याची भिंत तोडून आत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याप्रकरणीचा माहिती वांद्रे पोलिसांनी देत असताना त्यांनी सांगितले की, 19 ते 20 वर्षे वयोगटातील दोन तरुणांना ड्युटीवर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बंगल्यात प्रवेश करताना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्यांची चौकशी करून त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

त्यानंतर चौकशीदरम्यान दोघांनी पोलिसांना सांगितले की, आपण दोघे गुजरातमधून आलो असून आणि त्यांना शाहरुखला भेटायचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र तरीही या प्रकरणाचा पोलीस तपास करत असून या दोघा युवकांकडे असलेल्या मोबाईलही तपासासाठी ताब्यात घेण्यात आला आहे.

गुजरातच्या या युवकांनी शाहरुख खानच्या बंगल्या कोणतीही परवानगी न घेता आणि थेट भिंत तोडून प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांवर गुन्हा नोंद करून या दोन्ही मुलांचा मोबाईल आणि इतर साहित्याची तपासणी सुरु करण्यात आली आहे.

सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.
विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा
विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान.
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया.