AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मित्राला वाचवायला गेलेला मित्रही बुडाला, चार दिवसात तिघांचा दुर्दैवी मृत्यू

चार मित्र शुक्रवारी रिधोरा धरण परिसरात फिरायला गेले होते. दरम्यान ते धरणामागील घोगरा परिसरात गेले. यावेळी त्यांचा एक मित्र धरणात पोहायला उतरला होता.

मित्राला वाचवायला गेलेला मित्रही बुडाला, चार दिवसात तिघांचा दुर्दैवी मृत्यू
रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावर मच्छिमार बोट बुडालीImage Credit source: Google
| Updated on: Oct 29, 2022 | 2:28 PM
Share

महेश मुंजेवार, TV9 मराठी, वर्धा : मित्रांसोबत फिरायला गेलेल्या दोन तरुणांचा रिधोरा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात घडली आहे. सौरभ बावरकर आणि विकास नवघरे अशी मयत तरुणांची नावे आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. गेल्या चार दिवसात तीन तरुणांचा या धरणात बुडून मृत्यू झाला आहे.

चौघे मित्र धरण परिसरात फिरायला गेले होते

चार मित्र शुक्रवारी रिधोरा धरण परिसरात फिरायला गेले होते. दरम्यान ते धरणामागील घोगरा परिसरात गेले. यावेळी त्यांचा एक मित्र धरणात पोहायला उतरला होता. तो पाण्यात बुडू लागला म्हणून दोन मित्र त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरले.

वाचवायला गेले अन् स्वतःच बुडाले

मात्र वाचवायला गेलेल्या दोघांपैकी एक मित्रही बुडू लागला. यावेळी आरडाओरडा केल्याने स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून आले. नागरिकांनी वाचवायला गेलेल्यांपैकी एकाला सुखरुप वाचवले. तर अन्य दोघे जण बुडाले.

याप्रकरणी सेलू पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी गाठत पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. दोन दिवसांपूर्वीही याच धरणात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता.

कोपरगावमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या मावशी-भाचीचा मृत्यू

दिवाळीनिमित्त मामाच्या गावी आलेल्या नाशिकमधील मावशी-भाचीचा गोदावरी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. दोघी कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या होत्या. मात्र पाय घसरुन नदीत पडल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला. अर्चना जगदीश सोनावणे आणि गौरी शरद शिंदे अशी मयत मावशी-भाचीची नावे आहेत. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.