AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रियकराच्या साथीने पतीची हत्या, मृतदेह जिम कॉर्बेटच्या जंगलात फेकला, प्रेमी युगुलाला अटक

निपेंद्रची हत्या पत्नी कुसुम हिने प्रियकर नीरजच्या हातून केल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत कुसुमने सांगितले की, निपेंद्रला दारु पिण्याचे व्यसन होते. दारु पिऊन तो तिला अनेकदा मारहाण करत असे, त्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले

प्रियकराच्या साथीने पतीची हत्या, मृतदेह जिम कॉर्बेटच्या जंगलात फेकला, प्रेमी युगुलाला अटक
प्रियकराच्या साथीने पतीची हत्याImage Credit source: आज तक
| Updated on: May 15, 2022 | 3:36 PM
Share

लखनौ : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Crime News) मुरादाबादमध्ये एका महिलेने तिच्या प्रियकरासह पतीची हत्या (Husband Murder) करुन त्याचा मृतदेह जिम कॉर्बेटच्या जंगलात (Jim Corbett National Park) फेकून दिला. बऱ्याच प्रयत्नांनंतर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. महिलेचे लग्नाआधी प्रेमसंबंध होते. मात्र लग्नामुळे त्यात अडथळा आला. लग्नानंतर दोन वर्षांनी प्रियकराशी तिची पुनर्भेट झाली, त्यानंतर दोघं पुन्हा एकत्र आले. विवाहबाह्य संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्याचा निर्णय दोघांनी घेतला.

काय आहे प्रकरण?

या प्रकरणाचा खुलासा करताना पोलिसांनी सांगितले की, सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन हद्दीतील महालकपूर निजापूर येथील रहिवासी कुसुम पाल हिचा विवाह 2010 मध्ये बिजनौरमधील धामपूर येथील निपेंद्रसोबत झाला होता. निपेंद्र हा गेल्या काही दिवसांपासून पत्नी कुसुमसह सासरच्या घरी राहत होता. 5 मे 2022 रोजी निपेंद्र अचानक बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

मृतदेह जिम कॉर्बेटच्या जंगलात फेकला

या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात तपास सुरू केला असता निपेंद्रची हत्या पत्नी कुसुम हिने प्रियकर नीरजच्या हातून केल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत कुसुमने सांगितले की, निपेंद्रला दारु पिण्याचे व्यसन होते. दारु पिऊन तो तिला अनेकदा मारहाण करत असे, त्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले. पतीचा मृतदेह जिम कॉर्बेटच्या जंगलात फेकून दिला. कुसुमशी प्रेमसंबंध असल्याने तिच्या पतीची हत्या केल्याचे आरोपी नीरजने सांगितले.

नीरजने सांगितले की, आमचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. कुसुमचे लग्न झाले आणि आमचे नाते संपुष्टात आले. पण त्यानंतर दोन वर्षांनी आमचं बोलणं सुरु झालं. निपेंद्रला खूप दारु पाजून आम्ही ठार मारलं, कारण तो आमच्या प्रेमात अडथळा ठरत होता. त्यानंतर जिम कॉर्बेटचे जंगल असलेल्या डोंगरावरून त्याचा मृतदेह खाली फेकण्यात आला” दुसरीकडे, मृत निपेंद्रच्या भावाने सांगितले की, त्याला त्याच्या वहिनीवर आधीच संशय होता.

एसपी सिटी अखिलेश भदौरिया यांनी सांगितले की, 5 मे रोजी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात निपेंद्र बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. 10 मे रोजी निपेंद्रच्या कुटुंबीयांनी निपेंद्रची पत्नी कुसुम हिच्यावर संशय व्यक्त केला. कुसुमची चौकशी केली असता तिच्या अफेअरची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच नीरजचीही चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा मान्य केला. या हत्येतील आणखी दोन जण अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे

Follow Us
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!.
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य.
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात.
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा.
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल.
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल.
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका.
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप.
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले.