AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचे सुखोई-30 उड्डाणानंतर काही वेळातच रडाराहून गायब, मोठी खळबळ, थेट दोन पायलट…

भारताचे वायुसेनेतील सर्वात महत्वाचे लढाऊ विमान सुखोई-30 आहे. मात्र, सुखोई-30 चा मोठा अपघात झाला. विमानाचा शोध सुरू असून दोन पायलटही बेपत्ता आहेत. बचावकार्य वायुसेनेकडून राबवले जात आहे.

भारताचे सुखोई-30 उड्डाणानंतर काही वेळातच रडाराहून गायब, मोठी खळबळ, थेट दोन पायलट...
Sukhoi-30
| Updated on: Mar 06, 2026 | 9:02 AM
Share

इराण आणि अमेरिकेत मोठे युद्ध सुरू आहे. इस्त्रायल आणि अमेरिका मिळून इराणवर मोठे हल्ले करत आहे. यादरम्यान भारताने हे युद्ध थांबवण्याची भूमिका घेतली. या युद्धाचा थेट फटका भारतालाही बसताना दिसत आहे. भारतात तेलाचा तुटवडा निर्माण झाला. एलपीजी गॅसचीही मोठी समस्या आहे. पुढील 25 दिवस पुरेल इतकाच एलपीजी गॅस भारताकडे शिल्लक आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे. अमेरिकेने भारतावरील निर्बंध सध्याच्या स्थितीला काढली आहेत. आता भारतीय हवाई दलातून एक अतिशय धक्कादायक बातमी पुढे येत आहे. गुरुवारी संध्याकाळी आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे एसयू-30 एमकेआय लढाऊ विमान कोसळले. सुखोई-30 फाइटर जेट रडाराहून गायब झाले. या खुशोई लढाऊ विमानाचा शोध सुरू आहे. सुखोई हे विमान भारतीय वायुदलातील सर्वात महत्वाचे विमान असून ते अचानक अशाप्रकारे गायब झाल्याने खळबळ उडाली.

नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, लढाऊ विमानाबद्दल कोणतीही माहिती अजून मिळालेली नाही. विमानात दोन वैमानिक होते असे वृत्त आहे. सायंकाळी 7.42 ला विमानाचा रडार आणि ग्राऊंड कंटोलसोबत संपर्क तुटला. त्यानंतर लगेचच बचावकार्य राबवण्यात आले. कार्बीच्या 60 किलोमीटरवर विमानासोबत दुर्घटना झाली. सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे. मात्र, आतापर्यंत विमानाची माहिती मिळू शकली नाही.

संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी या घटनेवर बोलताना म्हटले की, भारतीय हवाई दलाचे सुखोई-30 एमकेआय विमान बेपत्ता झाले आहे. या विमानाने आसाममधील जोरहाट विमानतळावरून उड्डाण केले आणि संध्याकाळी 7.42 ला त्याचा रडारशी शेवटचा संपर्क झाला. त्यानंतर विमानाचा कोणताही संपर्क होऊ शकला नाही.

सध्या बेपत्ता विमानाचा शोध सुरू आहे. सुखोई-30 उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले. कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील बोकाजान येथील काही रहिवाशांनी दावा केला की, विमान जंगलात कोसळले. त्यानंतर त्या दिशेने तपास सुरू करण्यात आला. मात्र, अजूनही विमान किंवा पायलट मिळाले नाहीत. ज्या भागात विमान कोसळल्याचा दावा केला जात आहे, तिथे घनदाट जंगल आहे.

Follow Us
मराठी न आल्यास रिक्षा चालकांचा परवाना रद्द, या तारखेपासून नियम लागू
मराठी न आल्यास रिक्षा चालकांचा परवाना रद्द, या तारखेपासून नियम लागू.
हातात पिस्तूल, पैशांचे बंडल, अन्... अमरावतीतील आरोपीची रॉयल लाईफस्टाईल
हातात पिस्तूल, पैशांचे बंडल, अन्... अमरावतीतील आरोपीची रॉयल लाईफस्टाईल.
जय पवारांचं प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवणार, कारण...
जय पवारांचं प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवणार, कारण....
अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात अल्पवयीन मुलीने दिली संवेदनशील माहिती
अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात अल्पवयीन मुलीने दिली संवेदनशील माहिती.
नाशिक आयटी कंपनीतील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी
नाशिक आयटी कंपनीतील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी.
मुंबईतील ड्रग्स प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर
मुंबईतील ड्रग्स प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर.
देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना ओपन चॅलेंज, म्हणाले...
देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना ओपन चॅलेंज, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल, अडीच वर्षे झाली तरी आरक्ष
सुप्रिया सुळेंचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल, अडीच वर्षे झाली तरी आरक्ष.
गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळाव
गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळाव.
महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले "हे आधीच..
महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले