AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wardha : 70 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू, उष्माघाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज

महिलेचा मृतदेह वर्धा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला आहे.अल्लीपूर पोलिसांनी आकास्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शविविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पोलिस पुढील तपास करतील अशी माहिती मिळाली आहे.

Wardha : 70 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू, उष्माघाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज
70 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 21, 2022 | 10:15 AM
Share

वर्धा : वर्धा (Wardha) जिल्ह्याच्या अल्लीपूर येथे 70 वर्षीय वृद्ध महिलेचा घरातच मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. महिलेच्या घरातून दुर्गंधी येत होती, पाहणी केली असता महिलेचा मृ्त्यू झाल्याचे निदर्शनास आले. महिलेचा उष्माघाताने (Heatstroke) मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जातं आहे. पण 70 वर्षीय महिलेचा अचानक मृ्त्यू झाल्याने परिसरात घबराहट पसरली आहे. पोलिसांनी (Wardha Police) मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदन केल्यानंतर नेमका मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होईल. तसेच पोलिस घराची झाडाझडती घेतली असून संशयास्पद काही गोष्टीची पाहणी देखील केली आहे.

उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जातं आहे

जनाबाई अलमारी पवार असं मृत महिलेच नाव आहे. अल्लीपूर येथील गोळोबा वॉर्डात ही महिला एका टीनाच्या झोपड्यात एकटी राहत होती. सदर महिला ही मागील दोन दिवसांपासून घराच्या बाहेर नागरिकांना निदर्शनास आली नव्हती. एवढंच नव्हे तर महिलेच्या घरातून दुर्गंधी सुद्धा येत होती. दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत घराचे दार उघडले असता महिला ही मृतावस्थेत आढळली. महिलेचा मृतदेह हा काळसर झाला असून तिचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जातं आहे. महिलेचा मृतदेह वर्धा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला आहे.अल्लीपूर पोलिसांनी आकास्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शविविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पोलिस पुढील तपास करतील अशी माहिती मिळाली आहे.

उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जातं आहे

मागील दोन आठवड्यापासून वर्धा जिल्ह्याचे तापमान हे 45 अंशाच्या घरात आहे. वाढत्या तापमानाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम सुद्धा होत आहे. यामुळे येते काही दिवस नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. राज्यात सुध्दा उष्माघाताने आत्तापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने दुपारी आवश्यक काम असेल तरचं घरातून कामासाठी बाहेर पडा असं आवाहन केलं आहे.

तसेच राज्यातील आरोग्य विभागाने बाहेर जाताना काळजी घ्यावी असा सल्ला नागरिकांना दिला आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.