AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुपारी समजून महिलेने पकडली वस्तू, भीषण स्फोटानंतर बोटाच्या चिंधड्या, गावठी बॉम्ब असल्याचा संशय

सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एका महिलेने सुपारी समजून गावठी बॉम्बसदृश वस्तू हातामध्ये घेतल्यामुळे चांगलाच स्फोट झाला आहे. लक्ष्मी सखाराम देवळी असं या महिलेचं नाव असून त्या या स्फोटात जमखी झाल्या आहेत.

सुपारी समजून महिलेने पकडली वस्तू, भीषण स्फोटानंतर बोटाच्या चिंधड्या, गावठी बॉम्ब असल्याचा संशय
sindhudurg bomb
| Edited By: | Updated on: Oct 26, 2021 | 8:22 PM
Share

सिंधुदुर्ग : सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एका महिलेने सुपारी समजून गावठी बॉम्बसदृश वस्तू हातामध्ये घेतल्यामुळे चांगलाच स्फोट झाला आहे. लक्ष्मी सखाराम देवळी असं या महिलेचं नाव असून त्या या स्फोटात जमखी झाल्या आहेत. त्यांच्या हाताची बोटे तुटून बाजूला पडली आहेत.

सुपारी समजून अडकित्त्याने फोडण्याचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मी सखाराम देवळी या सावंतवाडी येथील ओटवणे येथील रहिवासी आहेत.  त्यांच्या मुलाने सुपारीसदृश्य वस्तू घरात आणली होती. या वस्तूला सुपारी समजून त्यांनी ती अडकित्त्याने फोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गोलाकार वस्तू फोडताच एका क्षणात मोठा स्फोट झाला. तसेच काही समजायच्या आता त्यांच्या हाताच्या बोटांच्या चिंधड्या उडाल्या. हाताची बोटे तुटल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे.

गावठी बॉम्ब असल्याचा प्राथमिक अंदाज 

हा प्रकार समजताच पोलिसांना घटनास्थळी दाखल होत पुढील तपास सुरु केला आहे. महिलेने सुपारी म्हणून फोडलेली वस्तू हा गावठी बॉम्ब असावा असा अंदाज बांधला जात आहे. पोलीस याच दिशेने आपला तपास करत आहेत. दरम्यान, हा जर गावठी बॉम्ब असेल तर तो कोणी तयार केला. तसेच लक्ष्मी देवळी यांच्या मुलाकडे तो कसा आला ? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन

दरम्यान, 8 ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला होता. पणजी (गोवा) कंट्रोल रुमला हा फोन आला होता. या फोनमुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली होती. फोनवरुन ही माहिती मिळताच मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी मंदिर तात्काळ बंद केलं होतं. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडून संपूर्ण मंदिर परिसराची तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी बॉम्ब किंवा बॉम्ब सदृश्य कोणतीही वस्तू सापडली नव्हती. अखेर हा फोन कॉल बोगस असल्याचं सिद्ध झालं होतं.

इतर बातम्या :

शाळेत खेळण्यावरुन वाद, थेट चाकू भोसकला, दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या, ठाण्यात खळबळ

Mumbai Drugs Case : ड्रग्स प्रकरणात दोन आरोपींना विशेष न्यायालयाकडून दिलासा, जामीन मिळालेले दोन आरोपी कोण?

दोन मुलांच्या आईला प्रपोज, नकारानंतर 21 वर्षीय तरुणातला सैतान जागा, कुऱ्हाडीचे सपासप वार

VIDEO : Mandeep Rode | चंद्रपुरात दारु दुकानांवर कारवाईची मनसेची मागणी@mnsadhikrut pic.twitter.com/22i9KnThFL

Woman loses fingers after explosive blows up while peeling areca nut in sawantwadi sindhudurg

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.