AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुपारी समजून महिलेने पकडली वस्तू, भीषण स्फोटानंतर बोटाच्या चिंधड्या, गावठी बॉम्ब असल्याचा संशय

सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एका महिलेने सुपारी समजून गावठी बॉम्बसदृश वस्तू हातामध्ये घेतल्यामुळे चांगलाच स्फोट झाला आहे. लक्ष्मी सखाराम देवळी असं या महिलेचं नाव असून त्या या स्फोटात जमखी झाल्या आहेत.

सुपारी समजून महिलेने पकडली वस्तू, भीषण स्फोटानंतर बोटाच्या चिंधड्या, गावठी बॉम्ब असल्याचा संशय
sindhudurg bomb
| Edited By: | Updated on: Oct 26, 2021 | 8:22 PM
Share

सिंधुदुर्ग : सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एका महिलेने सुपारी समजून गावठी बॉम्बसदृश वस्तू हातामध्ये घेतल्यामुळे चांगलाच स्फोट झाला आहे. लक्ष्मी सखाराम देवळी असं या महिलेचं नाव असून त्या या स्फोटात जमखी झाल्या आहेत. त्यांच्या हाताची बोटे तुटून बाजूला पडली आहेत.

सुपारी समजून अडकित्त्याने फोडण्याचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मी सखाराम देवळी या सावंतवाडी येथील ओटवणे येथील रहिवासी आहेत.  त्यांच्या मुलाने सुपारीसदृश्य वस्तू घरात आणली होती. या वस्तूला सुपारी समजून त्यांनी ती अडकित्त्याने फोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गोलाकार वस्तू फोडताच एका क्षणात मोठा स्फोट झाला. तसेच काही समजायच्या आता त्यांच्या हाताच्या बोटांच्या चिंधड्या उडाल्या. हाताची बोटे तुटल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे.

गावठी बॉम्ब असल्याचा प्राथमिक अंदाज 

हा प्रकार समजताच पोलिसांना घटनास्थळी दाखल होत पुढील तपास सुरु केला आहे. महिलेने सुपारी म्हणून फोडलेली वस्तू हा गावठी बॉम्ब असावा असा अंदाज बांधला जात आहे. पोलीस याच दिशेने आपला तपास करत आहेत. दरम्यान, हा जर गावठी बॉम्ब असेल तर तो कोणी तयार केला. तसेच लक्ष्मी देवळी यांच्या मुलाकडे तो कसा आला ? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन

दरम्यान, 8 ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला होता. पणजी (गोवा) कंट्रोल रुमला हा फोन आला होता. या फोनमुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली होती. फोनवरुन ही माहिती मिळताच मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी मंदिर तात्काळ बंद केलं होतं. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडून संपूर्ण मंदिर परिसराची तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी बॉम्ब किंवा बॉम्ब सदृश्य कोणतीही वस्तू सापडली नव्हती. अखेर हा फोन कॉल बोगस असल्याचं सिद्ध झालं होतं.

इतर बातम्या :

शाळेत खेळण्यावरुन वाद, थेट चाकू भोसकला, दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या, ठाण्यात खळबळ

Mumbai Drugs Case : ड्रग्स प्रकरणात दोन आरोपींना विशेष न्यायालयाकडून दिलासा, जामीन मिळालेले दोन आरोपी कोण?

दोन मुलांच्या आईला प्रपोज, नकारानंतर 21 वर्षीय तरुणातला सैतान जागा, कुऱ्हाडीचे सपासप वार

VIDEO : Mandeep Rode | चंद्रपुरात दारु दुकानांवर कारवाईची मनसेची मागणी@mnsadhikrut pic.twitter.com/22i9KnThFL

Woman loses fingers after explosive blows up while peeling areca nut in sawantwadi sindhudurg

Follow Us
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!.
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य.
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात.
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा.
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल.
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल.
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका.
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप.
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले.