AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MP Murder : मध्य प्रदेशात नवस फेडण्यासाठी तरुणाचा नरबळी, तीन मुलींनंतर झाला होता मुलगा

चौकशीदरम्यान आरोपी रामलालने पोलिसांना सांगितले की, त्याला तीन मुली आहेत. त्याने देवीला नवस केला होता की, जर त्याला मुलगा झाला तर तो मनुष्यबळी देईल.

MP Murder : मध्य प्रदेशात नवस फेडण्यासाठी तरुणाचा नरबळी, तीन मुलींनंतर झाला होता मुलगा
दौंडमध्ये अज्ञात कारणावरुन व्यक्तीची हत्याImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 14, 2022 | 6:18 PM
Share

मध्य प्रदेश : तीन मुलींनंतर मुलगा झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी एका तरुणाचा बळी दिल्याची घटना मध्य प्रदेशातील रीवा येथे घडली आहे. हे प्रकरण रीवा जिल्ह्यातील बैकुंठपूर पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या बेधौवा गावातील आहे. 6 जुलै रोजी पुरातन फुलमती माता मंदिराच्या दारात एका तरुणाचा मृतदेह (deadbody) आढळून आला होता. या तरुणाच्या गळ्यावर मागून कुऱ्हाडीने वार (Att758503ack) करून हत्या (Murder) करण्यात आली होती. दिव्यांश कोल (18) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. सकाळी गावातील लोकांनी मंदिरात मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आरोपीला अटक (Arrest) करत चौकशी केली असता त्याने धक्कादायक खुलासे केले आहेत.

घटनास्थळी कुऱ्हाड जप्त केली

घटनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बैकुंठपूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. सिरमौर एसडीओपी नवीन तिवारी एफएसएल युनिट आणि श्वान पथकासह तेथे पोहोचले. तपासादरम्यान घटनास्थळावरुन एक कुऱ्हाड जप्त करण्यात आली आहे. तपासासाठी फॉरेन्सिक टीम आणि सायबर सेलचीही मदत घेण्यात आली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. तपासाअंती हे नरबळीचे प्रकरण असल्याचे निष्पन्न झाले.

मुलगा झाल्यास मनुष्य बळी देण्याचा होता नवस

एसडीओपी नवीन तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामलाल प्रजापती (32) याने नवस पूर्ण करण्यासाठी मानवी यज्ञ केला. चौकशीदरम्यान आरोपी रामलालने पोलिसांना सांगितले की, त्याला तीन मुली आहेत. त्याने देवीला नवस केला होता की, जर त्याला मुलगा झाला तर तो मनुष्यबळी देईल. घरात तीन मुलींनंतर मुलगा जन्माला आल्यावर त्याला नवसानुसार तरुणाचा बळी द्यायचा होचा. तो मुलगा शोधत होता.

घटनेच्या दिवशी शेळ्या चारणारा हा तरुण त्याला सापडला. निर्जन ठिकाण असल्याने त्याने तरुणाला आपल्यासोबत बेधुआ गावातील देवीच्या मंदिरात आणले आणि कुऱ्हाडीने गळा चिरून हत्या केली. त्यानंतर तो फरार झाला. आरोपी गावात तंत्र-मंत्र आणि भूतविद्याही करतो. याआधीही त्याने मंदिरात हात कापून रक्त अर्पण केले होते. या घटनेमागील अन्य काही कारणे आहेत का याचाही शोध पोलीस घेत आहेत. (Youth killed in Madhya Pradesh due to superstition, Accused arrested)

मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे.
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका.
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!.
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार.
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद.
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती.
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष.
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक.