AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मालकाची हत्या करून फरार झालेला आरोपी 19 वर्षानंतर सापडला; ठाणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

डोंबिवलीत 8 मे 2001 साली एका लॉजमध्ये एका 56 वर्षीय व्यक्तिचा मृतदेह आढळून आला.

मालकाची हत्या करून फरार झालेला आरोपी 19 वर्षानंतर सापडला; ठाणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या
| Updated on: Nov 20, 2020 | 8:53 PM
Share

कल्याण : मालकाची हत्या करुन फरार झालेल्या आरोपीला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या (Kalyan Murder Case Solved) एक नंबर युनिटने 19 वर्षांनंतर आरोपी राजाराम राजीव शेट्टी याला अटक केली आहे. डोंबिवलीत हत्येचा प्रकार घडल्यानंतर सतत पोलीस या आरोपीच्या शोधात होती. त्यांच्या तपासाला 19 वर्षानंतर यश आहे(Kalyan Murder Case Solved).

डोंबिवलीत 8 मे 2001 साली एका लॉजमध्ये एका 56 वर्षीय व्यक्तिचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन सी.जे. रेगो नावाच्या व्यक्तिची हत्या करण्यात आली होती. रेगोसोबत त्याच्या केअर टेकर एच. राजाराम राजीव शेट्टी राहत होता. तो घटनेनंतर पसार झाला होता. हत्या एच. राजाराम शेट्टी याने केली असेल, असा पोलिसांचा दाट संशय होता.

रामनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला. आरोपीचा शोध सुरु होता. अनेक वर्षे शोध सुरु असून आरोपी मिळत नव्हता. ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशानंतर या गुन्हयाचा छडा लावण्यासाठी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट एकने काम सुरु केले.

पोलीस अधिकारी दत्तात्रय सरक यांना या प्रकरणाचा तपास दिला गेला होता. सहा महिन्यांपासून सरक आणि त्यांचे सहकारी हे शेट्टी याच्या शोधात होते. शेट्टीचा कर्नाटक येथील पत्ता पोलिसांकडे होता. त्याच्या आई आणि भावाविषयी पोलिसांना माहिती होती. मात्र, शेट्टीने लग्न न केल्याने तो एकांकी जीवन जगत होता. याचाच फायदा त्याला मिळत होता. अखेर गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार आनंद भिलारे यांना एच शेट्टी संदर्भात काही सुगावा लागला (Kalyan Murder Case Solved).

पोलीस अधिकारी दत्तात्रय सरक यांचे पथक नाशिकला शेट्टीच्या शोधासाठी निघाले. तो नाशिकला आढळून आला नाही. त्यानंतर पोलीस तपास पथक रायगडला गेला. अखेर शेट्टीला आज पहाटे विटावा नाका कळवा ठाणे येथेून सापळा रचून पकडण्यात आले.

या प्रकरणी पोलीस अधिकारी सरक यांचे म्हणणे आहे की, एच. राजाराम राजीव शेट्टी हा सी. जे. रेगो यांचा केअर टेकर होता. नंतर या दोघांमध्ये काही कारणावरुन वाद वाढत गेले. त्या रागातून शेट्टी याने रेगो यांची हत्या करुन पळून गेला होता. सध्या शेट्टीला रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

Kalyan Murder Case Solved

संबंधित बातम्या :

घरातून गायब झालेल्या तिघांचे मृतदेह झाडाला लटकलेले आढळले, आत्महत्येची शक्यता; शहापूर हादरले

शेजारी राहणाऱ्या तरुणाकडून वारंवार छेडछाड; वैतागलेल्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.