.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

11th Admission: अकरावी प्रवेशासाठी बहुतांश विद्यार्थ्यांनी भाग 2 भरलेले नाहीत, मार्गदर्शनाअभावी विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ

अकरावी प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना अजूनही तोंड द्यावे लागत आहे. विद्यार्थी दहावीत असताना शाळा स्तरावर प्रवेशासंदर्भातील मार्गदर्शन केले नसल्याने यावर्षी प्रवेशात गोंधळाची मालिका सुरु आहे.

11th Admission: अकरावी प्रवेशासाठी बहुतांश विद्यार्थ्यांनी भाग 2 भरलेले नाहीत, मार्गदर्शनाअभावी विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ
11th AdmissionImage Credit source: Social Media
| Edited By: Rachana Bhondave | Updated on: Aug 02, 2022 | 12:55 PM
Share

मुंबई: अकरावी प्रवेशात (11th Entrance) मुंबई विभागात एमएमआर क्षेत्रात प्रत्यक्षात 3 लाख 8 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. बहुतांश विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज लॉक केलेले नाहीत व भाग 2 भरलेले नाहीत असे तब्बल 50 हजारहून अधिक विद्यार्थी पहिल्या यादीपासून दूर आहेत. तब्बल 50 हजार विद्यार्थी गेले कुठे? असा प्रश्न पडला आहे. अकरावीला प्रवेश घेत असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची माहिती मिळत नसल्याने अकरावी (11th) प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना अजूनही तोंड द्यावे लागत आहे. विद्यार्थी दहावीत असताना शाळा स्तरावर प्रवेशासंदर्भातील मार्गदर्शन (Guidance) केले नसल्याने यावर्षी प्रवेशात गोंधळाची मालिका सुरु आहे.

734 तक्रारी प्राप्त

दरवर्षी सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांकडून प्रवेश फी घेवून कोट्यवधी रुपये शालेय शिक्षण विभागाकडे जमा होतात. विद्यार्थ्यांना प्रवेशाची माहिती का दिली जात नाही असा प्रश्न पालक आणि विद्यार्थी संघटनांनी उपस्थित करत आहेत. 734 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये मुंबईत आहे. दहावीत असताना विद्यार्थ्यांना प्रवेशाची माहिती पूर्वी दिली जात होती. अनेक शाळांत विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अर्ज कसा भरायचा, पसंतीक्रम कसे भरायचे तसेच माहिती तपासून अर्जाला मंजूरी ही प्रक्रिया माध्यमिक शाळेत चालत होती. गेले काही वर्ष याकडे शालेय शिक्षण विभागाने गांभीर्याने पाहिलेले नाही. शिक्षण उपसंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली ही यंत्रणा होती त्यावेळी सर्व प्रक्रिया होती. आता सर्व शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमिक शिक्षण संचालयाकडे ही जबाबदारी सोपवली आहे. यामुळे अकरावी प्रवेशात सावळा गोंधळ सुरु असल्याचे चित्र आहे.

नियोजनाअभावी गोंधळ

दहावीचा निकाल जाहीर झाला. प्रवेश अर्जाचा पहिला टप्पाही भरला. मात्र तो अंतिम कसा करायचा ही माहिती मिळत नसल्याने अनेक विद्यार्थी पहिल्या यादीपासून दूर आहेत. पार्ट 1 अर्ज आलेल्या विद्यार्थ्यांना दोन दिवसाची मुदतवाढ पालकांच्या मागणीनुसार नोंदणी केलेली नाही. दोन दिवसात 2 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी अंतिम झाली. नियोजनाअभावी गोंधळ पहायाला मिळतो. प्रत्येक विद्यार्थ्यांकडून २२५ रुपये नोंदणी फी घेतली जाते. शालेय शिक्षण विभाग दरवर्षी कोट्यवधी रुपये लाखो विद्यार्थ्यांच्या नोंदणी फीमधून जमा करते. मात्र फिच्या तुलनेत विद्यार्थ्यांना कोणतेही मार्गदर्शन मिळत नाही. ऑनलाइन परिपत्रक टाकली जातात आणि त्यातून प्रवेश घेण्याच्या सूचना केल्या जात आहेत. पालक, विद्यार्थ्यांना याची माहितीही नसते. प्रवेशाच्या वेळी तक्रारी घेवून आलेल्या पालकांच्या रांगा उपसंचालक कार्यालयाबाहेर सुरु झाल्या आहेत. संकेतस्थळावरही सुमारे तांत्रिक कारणे सांगणारी 242 आहेत.

परिपत्रकांची माहिती उशिरा

विद्यार्थ्यांना सूचना देताना वेळापत्रक व अन्य माहिती देण्यासाठी परिपत्रके जारी केली जातात. मात्र ती परिपत्रके रात्री अपलोड केली जातात. त्या परिपत्रकाची अंमलबजावणी मात्र सकाळपासूनची असते. यामुळे विद्यार्थी पालकांना माहितीही नसते. माहिती नसल्याने एक दिवसाचा कालावधी वाया गेलेला असतो. शिक्षण उपसंचालकांनी तरी माहिती तातडीने शाळा व महाविद्यालयांना द्यावी अशी मागणी होत आहे.

Follow Us
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
Navi Mumbai Rain | APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर; वाहतूक विस्कळीत
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड