CBSE Result Formula : सीबीएसई बारावीची परीक्षा रद्द मात्र निकालाचा फॉर्म्युला काय?, वाचा…

परीक्षा तर रद्द झाल्या पण निकालाचा फॉर्म्युला काय असणार?... मुलांना नेमकं कोणत्या आधारावर पास करणार?, मुल्यांकनासंदर्भात दुसरी कोणती पद्धत वापरणार?, अशा एक ना अनेक प्रश्नांनी विद्यार्थी पालकांच्या मनात घर केलंय. (CBSE Board 12th Exam Cancelled)

CBSE Result Formula : सीबीएसई बारावीची परीक्षा रद्द मात्र निकालाचा फॉर्म्युला काय?, वाचा...
फाईल फोटो
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 7:35 AM

मुंबई : देशातील वाढत्या कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाला केंद्र सरकारनं दोन दिवसात निर्णय घेऊ असं म्हटलं होत. त्याप्रमाणं बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र परीक्षा रद्द केल्यानंतर पालक आणि मुलांच्या मनामध्ये नवीन भ्रम तयार झालाय. तो संभ्रम आहे परीक्षा तर रद्द झाल्या पण निकालाचा फॉर्म्युला काय असणार?… मुलांना नेमकं कोणत्या आधारावर पास करणार?, त्यांना केवळ उत्तीर्ण झालेलं प्रमाणपत्र मिळणार की त्यांच्या मुल्यांकनासंदर्भात दुसरी कोणती पद्धत वापरणार?, अशा एक ना अनेक प्रश्नांनी विद्यार्थी पालकांच्या मनात घर केलंय. (CBSE Board 12th Exam Cancelled but What is result Formula)

दहावीच्या धर्तीवर सीबीएसई बोर्ड 12 वीच्या मूल्यांकनाचे निकष ठरवणार?

इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन निकष सध्या तरी जाहीर केले जाणार नाहीत. या मुल्यांकन निकषाला अंतिम रुप देण्यात काही वेळ लागेल, म्हणून ते निकष नंतर प्रसिद्ध केले जातील, असं सीबीएसईने स्पष्ट केलंय. दहावीच्या धर्तीवर सीबीएसई बोर्ड 12 वीच्या मूल्यांकनाचे निकषदेखील ठरवेल, अशीही चर्चा आहे.

ज्याप्रमाणे सीबीएसई बोर्डाने दहावीचा निकाल तयार करण्यासाठी वस्तुनिष्ठ निकष तयार केले आहेत. त्याच आधारावर बारावीसाठीचे निकषदेखील ठरवले जातील. दहावीसाठीही अशी व्यवस्था केली गेली आहे की, जर विद्यार्थी या प्रक्रियेनंतर दिलेल्या गुणांवर समाधानी नसेल तर त्याला कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर पुन्हा परीक्षेला बसण्याची, हजर राहण्याचीही संधी दिली जाईल.

अंतिम निकाल कसा लागणार?

बारावीच्या विद्यार्थ्याचा निकाल जाहीर करण्यासाठी वस्तूनिष्ठ कार्यपद्धती जाहीर केली जाईल. विद्यार्थ्यांच हित लक्षात घेऊन सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांचं आरोग्य याचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं मोदी म्हणाले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात संभ्रम होता तो या निर्णयामुळं दूर कऱण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी सक्ती केली जाणार नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

(CBSE Board 12th Exam Cancelled but What is result Formula)

हे ही वाचा :

CBSE Board 12 Exam cancelled: बारावीच्या परीक्षा रद्द, मोदी सरकारचा मोठा निर्णय

Non Stop LIVE Update
राज्यातील सर्वंच आमदारांना अनुभव येणार, जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य काय
राज्यातील सर्वंच आमदारांना अनुभव येणार, जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य काय.
नकाबचा जवाब द्यावाच लागेल, फडणवीसांच्या पत्रावरून मनसेचं काय म्हणणंय?
नकाबचा जवाब द्यावाच लागेल, फडणवीसांच्या पत्रावरून मनसेचं काय म्हणणंय?.
मी बकरा नाही तर...नीलम गोऱ्हे यांच्या 'त्या' टीकेवर राऊतांचा पलटवार
मी बकरा नाही तर...नीलम गोऱ्हे यांच्या 'त्या' टीकेवर राऊतांचा पलटवार.
नांदेडमधील मैदान मराठ्यांच्या गर्दीनं कच्चून भरलं, नुसत भगवं वादळ
नांदेडमधील मैदान मराठ्यांच्या गर्दीनं कच्चून भरलं, नुसत भगवं वादळ.
मलिकांबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनांचा आनंद पण.. दानवेंचा लेटरबॉम्ब
मलिकांबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनांचा आनंद पण.. दानवेंचा लेटरबॉम्ब.
मलिक अजितदादांसोबत गेल्यावर मज्जा येईल, बच्चू कडूंचं मिश्कील भाष्य काय
मलिक अजितदादांसोबत गेल्यावर मज्जा येईल, बच्चू कडूंचं मिश्कील भाष्य काय.
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत...
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत....
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्..
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्...
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला.
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी.