AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मांतरणावरून वाद पेटला, TCS कडून कर्मचाऱ्यांना आनंदवार्ता, सगळ्यांचीच नोकरी वाचली, पगाराविषयी सर्वात मोठा निर्णय

TCS: भारतातील मोठी आयटी कंपनी टीसीएसच्या नाशिक कार्यालयात कर्मचाऱ्यांचे धर्मांतरण आणि लैंगिक शोषणाचा आरोप झाला आहे. प्रकरणात 7 जणांना अटक करण्यात आली आहे. तर एचआर निदा खान फरार आहे. याच वादा दरम्यान टीसीएसने कर्मचार्‍यांना मोठी आनंदवार्ता दिली आहे.

धर्मांतरणावरून वाद पेटला, TCS कडून कर्मचाऱ्यांना आनंदवार्ता, सगळ्यांचीच नोकरी वाचली, पगाराविषयी सर्वात मोठा निर्णय
टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेज पगारवाढImage Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 16, 2026 | 3:16 PM
Share

Tata Consultancy Services: देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेज (TCS) सध्या एका वेगळ्याच प्रकरणाने गाजत आहे. नाशिक येथील कार्यालयात धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर एचआर निदा खान फरार आहे. हा वाद उफाळला असतानाच कंपनीने कोणत्याही कर्मचार्‍याला आता काढले जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. आता कंपनी स्टँडर्ड इंक्रीमेंट सायकलवर परतली आहे. म्हणजे पगार वाढीसाठी वाट पाहावी लागणार नाही अथवा आहे त्या पगारात काम करावे लागणार नाही. TCS ने हा निर्णय 1 एप्रिलपासून लागू केला आहे.

गेल्यावर्षी नोकरीवरून काढण्याचा निर्णय

गेल्यावर्षी 2025 च्या जुलै महिन्यात कंपनीने मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीचे शस्त्र उगारले होते. एकूण कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 12,261 कर्मचार्‍यांना घरी पाठवण्यात येणार होते. स्ट्रक्चरल रिस्ट्रक्चरिंग आणि AI (Artificial Intelligence) साठी ही कपात सुरू होती. कंपनीच्या या निर्णयामुळे अनेक कर्मचारी असुरक्षित झाले होते. त्यांना पगारवाढ सोडा नोकरी टिकणार की नाही याची भीती वाटत होती. तर याच धोरणाचा वापर करत नाशिकमध्ये धर्मांतरण आणि लैंगिक शोषण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. कर्मचार्‍यांना नोकरीवरून काढण्याची नेहमी भीती दाखवून ही टोळी त्यांना लुबाडत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

का घेतला कंपनीने हा निर्णय?

टीसीएस कंपनीचे सीईओ के. कृतिवासन यांच्यानुसार, कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत आहे. जागतिक बाजारात कंपनीने चांगली मांड ठोकली आहे. TCS कंपनीने चौथ्या तिमाहीत 13718 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या समान तिमाहीतील नफ्यापेक्षा हा 12.2 टक्क्यांनी जास्त आहे. तर कंपनीचा महसूल हा 9.6 टक्क्यांनी उसळून 70698 कोटी रुपयांवर पोहचला आहे. कंपनीने गेल्या काही कालावधीत 12 अब्ज डॉलरचे नवीन करार केले आहे. त्यात अनेक मोठे करार सुद्धा आहे.

कामाच्या कामगिरी आधारे कंपनीत कर्मचाऱ्यांचा पगार वाढतो. आकडेवारीनुसार, जबरदस्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुप्पट पगार वाढ मिळण्याची शक्यता आहे. रेटिंग आणि ग्रेड आधारे इतर कर्मचाऱ्यांना पगार वाढ देण्यात येईल. ही पगारवाढ साधारणपणे 4.5 टक्के ते 7 टक्क्यांपर्यंत होणार आहे.

Follow Us
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?.
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान.
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार.
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल.
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं.
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान.
भोंदू खरात प्रकरणी पडद्यामागे मोठ्या हालचाली, पोलिसांकडून... बड्या नेत
भोंदू खरात प्रकरणी पडद्यामागे मोठ्या हालचाली, पोलिसांकडून... बड्या नेत.
नाशिकच्या IT कंपनीतील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे मलेशिया कनेक्शन,
नाशिकच्या IT कंपनीतील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे मलेशिया कनेक्शन,.
अमरावती अत्याचार प्रकरणात पोलीस अलर्ट मोडवर, आयाज अहमदच्या घरावर बुलडो
अमरावती अत्याचार प्रकरणात पोलीस अलर्ट मोडवर, आयाज अहमदच्या घरावर बुलडो.
कैसा हराया... म्हणणाऱ्या सहर शेख यांचं नगरसेविका पद धोक्यात, नेमकं काय
कैसा हराया... म्हणणाऱ्या सहर शेख यांचं नगरसेविका पद धोक्यात, नेमकं काय.