AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CBSE 12th Result 2021: सीबीएसई निकालावर विद्यार्थी नाराज, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा

रमेश पोखरियाल यांनी नाराज विद्यार्थ्यांना त्यांचं नुकसान होणार नाही असं आश्वासन देत महत्त्वाची घोषणा केली. यानुसार जे विद्यार्थी बारावीच्या मुल्यांकन पद्धतीने घोषित केलेल्या निकालावर समाधानी नसतील त्यांना लेखी परीक्षा देता येणार आहे.

CBSE 12th Result 2021: सीबीएसई निकालावर विद्यार्थी नाराज, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा
| Edited By: | Updated on: Jul 06, 2021 | 2:40 AM
Share

CBSE 12th Result 2021 नवी दिल्ली : सीबीएसईने 12 वीच्या परीक्षा रद्द करुन मुल्यांकन पद्धतीनुसार निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यावर अनेक विद्यार्थी नाराजी व्यक्त करत आहेत. ही नाराजी अगदी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांच्यापर्यंत पोहचली (CBSE 12th Result 2021). त्यानंतर आता रमेश पोखरियाल यांनी नाराज विद्यार्थ्यांना त्यांचं नुकसान होणार नाही असं आश्वासन देत महत्त्वाची घोषणा केली. यानुसार जे विद्यार्थी बारावीच्या मुल्यांकन पद्धतीने घोषित केलेल्या निकालावर समाधानी नसतील त्यांना लेखी परीक्षा देता येणार आहे. ही परीक्षा कधी घेणार याचीही शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केलीय (Education Minister Ramesh Pokhriyal Nishank answer question of students about CBSE 12th Result 2021).

केंद्रीय शिक्षा मंत्री रमेश पोखरियाल (Education Minister Ramesh Pokhriyal Nishank) म्हणाले, “सीबीएसईच्या बारावीच्या निकालावर जे विद्यार्थी नाराज आहेत त्यांच्यासाठी ऑगस्टमध्ये परीक्षेचं आयोजन करण्यात येईल. विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षा केंद्र सरकारसाठी सर्वाधिक महत्त्वाची आहे.”

शिक्षण मंत्र्यांकडून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरं

शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांनाही उत्तरं दिली. ते म्हणाले, “ज्या विद्यार्थ्यांच्या मनात शंका आहेत मी त्यांना विश्वास देतो. जर तुम्ही तुमच्या मुल्यांकनावर समाधानी नसाल तर काळजी करु नका. तुमच्यासाठी आम्ही ऐच्छिक परीक्षेचं आयोजन करु. ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांना न्याय मिळाला नाही असं वाटतंय त्यांच्या क्षमतेसोबत नक्कीच न्याय होईल. कोरोना परिस्थिती निवळली की आम्ही ऑगस्टमध्ये परीक्षा घेऊ. त्यामुळे मनात कोणत्याही प्रकारची शंका ठेऊ नका.”

निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू

सीबीएसईचा बारावी निकाल (CBSE 12th Result 2021) तयार करण्याची प्रक्रिया सुरू झालीय. सीबीएसईच्या शाळांना बोर्डाने तसे निर्देश दिलेत. अकरावी वर्गातील विद्यार्थ्यांना मिळालेले गुण 30 जूनपर्यंत अपलोड करण्यात आलेत. याशिवाय सीबीएसईने शाळांना प्रॅक्टिकल आणि प्रोजेक्ट मार्क्स 5 जुलैपर्यंत अपलोड करण्यास सांगितलेत. निशंक म्हणाले, “मी पुन्हा एकदा सांगतो की मी तुमच्याशी सातत्याने बोलत आलो आहे.”

हेही वाचा :

CBSE Exam : सीबीएसईचा मोठा निर्णय, 10 वी आणि 12 वीची वर्षातून दोनवेळा परीक्षा होणार

CBSE 10th Result 2021: सीबीएसईचा निकाल अंतिम टप्प्यात, काहीच दिवसांपूर्वी निकाल जाहीर होणार

CBSE ने लॉंच केलं हँडबुक, इयत्ता 6 वी आणि 8 वीच्या विद्यार्थ्यांना ‘हँडक्राफ्ट’ शिकण्याची संधी

व्हिडीओ पाहा :

Education Minister Ramesh Pokhriyal Nishank answer question of students about CBSE 12th Result 2021

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.