AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

HSC SSC Exam Time : मोठी बातमी, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय , लेखी परिक्षेसाठी वाढीव वेळ मिळणार

शाळांमध्ये पाठवण्यात आलेल्या ऑफलाईन वेळापत्रकावरच विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवावा, असं आवाहन बोर्डाकडून करण्यात आलं आहे. याशिवाय यंदाच्या दहावी बारावीच्या लेखी परीक्षांमध्ये विद्यार्थी हिताचा बदल करण्यात आला आहे.

HSC SSC Exam Time : मोठी बातमी, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय , लेखी परिक्षेसाठी वाढीव वेळ मिळणार
शरद गोसावी. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ
| Edited By: | Updated on: Dec 22, 2021 | 8:07 AM
Share

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून (MSBHSE) दहावी बारावीचं सविस्तर वेळापत्रक (SSC HSC Exam Time Table) काल जाहीर केलं आहे. मंडळानं विद्यार्थ्यांच्या प्राथमिक माहितीसाठी वेळापत्रक वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेलं आहे. याशिवाय वेळापत्रक शाळांना पाठवलं जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. शाळांमध्ये पाठवण्यात आलेल्या ऑफलाईन वेळापत्रकावरच विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवावा, असं आवाहन बोर्डाकडून करण्यात आलं आहे. याशिवाय यंदाच्या दहावी बारावीच्या लेखी परीक्षांमध्ये विद्यार्थी हिताचा बदल करण्यात आला आहे. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी अर्धा तास आणि पंधरा मिनिटे वेळ (Extra Time for HSC SSC Written Exam ) वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.

कोरोनामुळं लेखनाचा सराव कमी

दहावी बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वाढीव वेळ देण्यात येणार आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झालेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळानं या गोष्टीची दखल घेत विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला आहे. 70, 80, 100 मार्काचे लेखी परीक्षेचे पेपर असतील त्या पेपर साठी 30 मिनिटे अधिक वेळ दिलेला आहे. तर 40, 50, 60 गुणांचे लेखी पेपर असतील त्यासाठी 15 मिनिटे अधिक वेळ देण्यात आल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.

दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर ट्विट करुन दहावी बारावीच्या परीक्षा कशा होणार याबद्दलचा संभ्रम दूर झाल्याचं म्हटलं आहे. मुंबई दहावी आणि बारावीच्या परीक्षेबद्दलचा संभ्रम दूर झाला असून त्या नियमित मूल्यमापन पद्धतीने ऑफलाईनच होणार असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. यानंतर आता परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शाळांनी mahahsscboard.in वेळापत्रक पाहण्यासाठी या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

दहावी बारावीच्या परीक्षा कधी?

महाराष्ट्र राज्य माध्यिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक आज जाहीर करण्यात आलंय. बारावीच्या परीक्षा (HSC) 4 मार्च ते 7 एप्रिलदरम्यान पार पडणार आहेत. 14 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत बारावीच्या तोंडी परीक्षा होणार आहेत. तर त्यानंतर दहावीच्या (SSC) परीक्षांना सुरूवात होणार आहे. दहावीच्या परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिलदरम्यान पार पडणार आहेत. 25 फेब्रुवारी ते 14 मार्च दहावीच्या तोंडी परीक्षा होणार आहेत.

इतर बातम्या:

SSC Exam : दहावीच्या परीक्षेचे अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ; बोर्डाकडून नव्या तारखा जाहीर

Maharashtra HSC SSC exam schedule 2022 : दहावी बारावीच्या परीक्षांचं सविस्तर विषयनिहाय वेळापत्रक जाहीर, वाचा एका क्लिकवर

Maharashtra HSC SSC exam Board gave extra time to students for written exam of HSC SSC Exam 2022

Follow Us
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.