AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विद्यापीठाच्या २९९ परीक्षांच्या तारखा जाहीर, वाचा कधीपासून सुरु होणार कोणती परीक्षा

mumbai university Exam | मुंबई विद्यापीठाने २०२३-२४ च्या उन्हाळी सत्राच्या मानव्य विद्याशाखेच्या एकूण ६९ परीक्षा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या ५७ परीक्षा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या ७५ परीक्षा व आंतर विद्याशाखेच्या ९८ अशा एकूण २९९ परीक्षेच्या तारखा विद्यापीठाने जाहीर केल्या आहेत.

विद्यापीठाच्या २९९ परीक्षांच्या तारखा जाहीर, वाचा कधीपासून सुरु होणार कोणती परीक्षा
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 04, 2024 | 10:32 AM
Share

मुंबई | दि. 4 मार्च 2024 : मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या उन्हाळी सत्राच्या २९९ परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या या परीक्षा मार्चपासून सुरु होत आहेत. या उन्हाळी सत्र परीक्षेला २ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी बसणार आहेत. विद्यापीठ दरवर्षी चार विद्याशाखेच्या ४५० पेक्षा जास्त परीक्षा घेत असते. विद्यापीठाने २०२३-२४ च्या उन्हाळी सत्राच्या मानव्य विद्याशाखेच्या एकूण ६९ परीक्षा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या ५७ परीक्षा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या ७५ परीक्षा व आंतर विद्याशाखेच्या ९८ अशा एकूण २९९ परीक्षेच्या तारखा विद्यापीठाने जाहीर केल्या आहेत. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील.

महत्वाच्या परीक्षांच्या तारखा

  • बीकॉम सत्र ६ : २२ मार्च २०२४
  • बीए सत्र ६ : ३ एप्रिल २०२४
  •  बीएस्सी सत्र ६ : ३ एप्रिल २०२४
  •  बीएस्सी – कॉम्प्युटर सायन्स, आयटी व बायोटेक. सत्र ६ : १९ एप्रिल २०२४
  • बीए एमएमसी सत्र ६ : १६ एप्रिल २०२४
  •  बीकॉम फिनांशियल मार्केटस,
  • बीकॉम बँकिंग अँड इन्शुरन्स,
  • बीकॉम अकाऊंटिंग अँड फायनान्स,
  • बीकॉम इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट,
  • बीकॉम फिनांशियल मॅनेजमेंट,
  • बीकॉम ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सत्र व
  • बीएमएस सत्र ६ : १५ एप्रिल २०२४

विद्याशाखानिहाय परीक्षा

  • विद्याशाखानिहाय परीक्षा संख्या
  • मानव्य विद्याशाखा व विधी शाखा : ६९
  • वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा : ५७
  • विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा : ७५
  • आंतर विद्याशाखा : ९८

एमएच्या परीक्षेत घोळ

मुंबई विद्यापीठाच्या १ मार्च रोजी झालेल्या परीक्षेत घोळ झाला होता. एमएच्या प्रश्नपत्रिकेत चुकीचा प्रश्नसंच दिला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुसऱ्या प्रश्नपत्रिकेसाठी चार तास वाट पाहावी लागली. दुपारी २.३० वाजता प्रश्नपत्रिका मिळाल्यावर विद्यार्थ्यांनी ‘भारतची विदेश नीती’ या विषयाच्या पेपरमध्ये झालेला घोळ लक्षात आणून दिला. त्यानंतर दुपारी २.३० वाजताचा पेपर ४.४० वाजता सुरु झाला. त्यानंतर संध्याकाळी सात वाजेपर्यंत परीक्षा सुरु होती. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Follow Us
मुंबईत दुधाच्या दरात 1 सप्टेंबरपासून 9 रुपयांची वाढ
मुंबईत दुधाच्या दरात 1 सप्टेंबरपासून 9 रुपयांची वाढ
नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी शिंदेंचा संवाद
नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी उपमुख्यमंत्री शिंदेंचा व्हिडीओ कॉल
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं